HW News Marathi
महाराष्ट्र

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजप गंमत बघत बसले, पृथ्वीराज चव्हाणांचा टोला

मुंबई | भाजपला खरोखरच मराठा आरक्षण द्यायचं होतं का?, हाच प्रश्न आहे, असं म्हणत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. मराठा आरक्षणाचा अध्यादेश मागील सरकारचा आहे. आमच्या सरकारला वेळ द्यायला हवा. यावर आम्ही घाईगडबडीने म्हणणे मांडणे योग्य नाही, असे विरोधी पक्षाने सांगायला हवे होते मात्र त्यांनी तस न करता करता ते गंमत बघत बसले, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाने स्थगिती मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्यानंतर राज्यात मराठा आरक्षणाची मागणी जोर धरु लागली आहे. त्यातच मराठा नेत्यांनी १० ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. कोल्हापुरात काल (२३ सप्टेंबर) पार पडलेल्या मराठा समाज गोलमेज परिषदेत हा निर्णय घेण्यात आला आहे. मागण्या मान्य झाल्या तर महाराष्ट्र बंद मागे घेऊ, पण समाधानी प्रतिसाद मिळाला नाही तर महाराष्ट्रातील मराठा समाज १० ऑक्टोबरला रस्त्यावर येईल असे सांगण्यात आले आहे. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अध्यक्ष सुरेश पाटील यांनी ही माहिती दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सर्वोच्च न्यायालयाने ही तत्परता इत कैद्यांच्या बाबतीत का दाखवली नाही? प्रशांत भुषण यांचा सवाल

News Desk

बीडमध्ये २४ वर्षीय विवाहितेवर सामूहिक बलात्कार; चौघांवर गुन्हा नोंद!

Aprna

“पार्थ मनाने खूप चांगला पण निर्णय घेताना कधीकधी अचानक…”

News Desk