HW News Marathi
देश / विदेश

खाजगी डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवू नयेत, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई | “खाजगी डॉक्टरांनी आपापले दवाखाने बंद ठेवून नियमित रुग्णांची गैरसोय करू नये” असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्याचप्रमाणे, “राज्यांच्या सीमा बंद असून आता इतर राज्यांतील अडकलेल्या नागरिकांची राज्यशासन काळजी घेईल”, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री आज (२६ मार्च) सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांशी वर्षा येथून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील महत्वपूर्ण सूचना केल्या आहेत.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले कि, “खाजगी डॉक्टरांनी त्यांचे दवाखाने सुरु ठेवणे गरजेचे आहे. कोरोनाव्यतिरिक्त देखील त्यांच्याकडे इतर रोगांच्या उपचारासाठी रुग्ण येतात. त्यात वयोवृद्ध, महिला, मुले असतात त्यांची गैरसोय होऊ नये. लवकरच आपण अत्यावश्यक सेवेतील सर्वाना ओळखपत्र देत आहोत. त्यात डॉक्टर, त्यांच्याकडील कर्मचारी सर्वांचा समावेश असेल.” त्याचप्रमाणे “आपल्या जिल्ह्यात परदेशांतून गेल्या १५ दिवसांत जर कुणी प्रवास करून आले असेल तर जिल्हाधिकारी यांनी त्यांची माहिती घ्यावी व सदरील व्यक्तींची तपासणी करून घेणे महत्वाचे आहे”, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

इतर राज्यांतील अडकलेल्या नागरिकांची राज्यशासन काळजी घेईल !

“जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व्यवस्थित राहील. लोकांना औषधे वेळच्या वेळी उपलब्ध होतील हे पाहावे. शेतकरी आणि विशेषतः: शेतीच्या कामासाठी जा ये करणारे याना अडथळा होणार नाही हे पाहावे”, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. “कोणत्याही परिस्थितीत इतर राज्यांतून आपल्या राज्यात येऊन थांबलेल्या नागरिकांची इथेच आम्ही काळजी घेऊ. लॉकडाऊन पूर्ण होईस्तोवर आता त्यांना परत पाठवणे शक्य होणार नाही. महाराष्ट्रातले लोक जर इतर राज्यांत कुठे अडकले असतील तर त्यांचीही त्या त्या राज्यांनी काळजी घ्यावी” अशा सूचना दिल्या आहेत.

पोलिसांवर मोठी जबाबदारी, त्यांनी डोके शांत ठेवावे !

“जीवनावश्यक वस्तूंसाठी उपयोगात आणली जाणारी वाहतूक पोलीस अडवणार नाहीत पण कोणत्याही परिस्थितीत अशा वाहनांमधून या कामाशी संबंधित नसलेले लोक प्रवास करताना आढळले तर कारवाई केली जाईल. प्रत्येक जिल्ह्यात किती रुग्ण क्वारंटाईन करू शकतो तसेच कोरोना साठी किती वॉर्ड किंवा रुग्णालय राखून ठेवू शकतो त्याचे व्यवस्थित नियोजन करून तात्काळ कळवावे. कोरोना विरुद्धच्या या लढाईत आपण अतिशय नियोजनपूर्व पद्धतीने जात आहोत. पोलिसांवर मोठी जबाबदारी आहे, त्यांनी डोके शांत ठेवावे”, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#DelhiElectionResults Live Updates | तिसऱ्यांदा अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार

swarit

छत्तीसगडमधील नक्षलवादी हल्ल्यात दूरदर्शनच्या कॅमेरामनचा मृत्यू

swarit

केरळच्या पुरग्रस्त परिस्थितीची पंतप्रधानांनी केली पहाणी, केरळला ५०० कोटींची मदत जाहीर

News Desk