HW News Marathi
महाराष्ट्र

युवा चाईल्ड लाईन या संस्थेमार्फत जनजागृती मोहीम

मुंबई | युवा चाईल्ड लाईन या संस्थेमार्फत रामबाग मिल, महाराष्ट्र वखार, शिवडी येथील झोपडपट्टीमधील मुलानंमध्ये असलेली भीती आणि वाढत्या बाल गुन्हेगारी थांबविण्यासाठी युवा चाईल्ड लाईनने जनजागृती मोहीम राबविली. यावेळी सहभागीतेचा अधिकार, सुरक्षतेचा अधिकार, विकासाचा अधिकार, जगण्याचा अधिकार या 4 मुद्द्यां द्वारे जनजागृती करण्यात आली.

तसेच यावेळी रामबाग मिल ते किरवाई पोलीस ठाण्यापर्यंत रॅली देखील काढण्यात आली. चाईल्ड लाईन से दोस्ती ह्या कॅम्पन द्वारे पोलिसांशी मैत्री करून देण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. लहान मुलानंमध्ये असलेली पोलिसांबद्दलची भीती दूर व्हावी. किंवा लहान मुलांच्या मनात पोलिसांबद्दल असलेला राग निघून जावा म्हणून चाईल्ड लाईन से दोस्ती या कॅम्पन द्वारे जनजागृती मोहीम अनेक विभागात सुरू आहे. यावेळी मुलांनी पोलिसांना बँड तसेच गुलाबाचे फुल देऊन मैत्रीचा हात पुढे केला.

युवा संस्था 1984 पासून भारतातील 5 राज्यांमध्ये मुलांचे अधिकार आणि त्यांच्यावर शहरीकरण या मुळे मुलांवर होणारे परिणाम या विषयां वर बालकांमध्ये जनजागृति आणि त्यांचे मुद्द्दे वकालतिच्या माध्यमातून बाल सौरक्षण व्यवस्था, धोरण तयार करण्यासाठी आणि मध्यमांमधून जनजागृति करत आहोत. भारतात मुलांचे प्रमाण हे 2011 च्या दृष्टीने 40 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. 2020 पर्यंत शहरात राहणाऱ्या मुलांचे आणि युवकांचे प्रमाण वाढणार आहे. शहरा मध्ये राहणाऱ्या मुलांना अनेक वेळा घर आणि त्या संबंधी मुलभुत सुविधा पासून वंचित आहेत.

बाल अधिकार संघर्ष संघटन मुंबई विभागातील मुलांनी ह्या वेळी पथनाट्य च्या माध्यमातून आपले मुद्द्दे लोकंसमोर मांडले. शहर मुलांसाठी अधिक सुरक्षित आणि राहण्या योग्य करणे ही सर्वांची जबाबदारी आहे त्यासाठी सर्व नागरिकांनी एकत्र येऊन मुलांच्या दृष्टीने संवेदनशील बनले पहिजे ह्यासाठी मानवी अधिक प्रभावी ठरली. अनेक नागरिकांनी यात आपला सहभाग घेतला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

सचिन वाझे पोलिस सेवेतून बडतर्फ !

News Desk

“एकनाथ खडसेंविरुद्धची कारवाई सूडबुद्धीने, ते ईडीला घाबरत नाहीत”, राष्ट्रवादीचं वक्तव्य

News Desk

गुगल क्लासरुम सुरु करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरल्याचा सार्थ अभिमान !

News Desk
महाराष्ट्र

“किल्ला पडलेला का आहे? पूर्वी किल्ला कसा दिसायचा?”

News Desk

नागपूर | गेली ४ वर्षे दिवाळीत मातीचे किल्ले बनवणारे नागपूरचे अजिंक्य जोशी आणि पुष्कर व प्रसाद दहासहस्त्र यांना लहान शाळकरी मुले विचारत असत. त्यामुळे, यंदाच्या वर्षी जेव्हा छत्रपती शिवरायांची राजधानी रायगड बनवण्याचा निर्धार या त्रिकुटाने केला, तेव्हाच शिवकाळात रायगड कसा दिसत असावा याची काल्पनिक प्रतिकृती उभी करण्याचे ठरवले. त्यासाठी, प्रत्यक्ष किल्ले रायगडच्या २ वेळा वाऱ्या केल्या; थेट नागपूर ते रायगड आणि तिथल्या सध्याच्या वास्तू आणि जोते यांच्या वरून शिवकालीन गडाचे काल्पनिक चित्र उभारले.

आपण मातीचे किल्ले लहान मुलांवर संस्कृती आणि परंपरा यांचे संस्कार व्हावे यासाठी बनवतो, त्यामुळे त्यांना पडलेला किल्ला न दाखवता, शिवकालीन अंदाजित किल्ला दाखवावा, असा निर्धार केला. त्यासाठी, पुण्याचे प्राध्यापक सचिन जोशी यांचे मार्गदर्शन घेतले व अनेक रायगडचे पुरातत्वीय नकाशे जमवले. शिवाय, गोपाळ चांदोरकर यांच्या श्रीमद रायगिरौ यांच्या पुस्तकाचा आधार घेतला. त्याप्रमाणे, मोठ्या प्रमाणात लागणारे साहित्य जसे माती, विटा आणि लगदा जमवला. २० दिवसांच्या अथक परिश्रमानंतर किल्ला तयार केला. किल्ल्याला महाराष्ट्रभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Related posts

“कोव्हिड काळात मुख्यमंत्र्यांकडून योग्य पद्धतीने नियोजन!”, एकनाथ शिंदेंचं सीटी रवींना प्रत्युत्तर

News Desk

प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी राणा दाम्पत्यांचे सर्व प्रकार सुरू, बच्चू कडूंची टीका

Aprna

“साधेपणानं कार्यक्रम कर असं सांगितलं होतं पण…”,अजितदादांनी टोचले आमदाराचे कान

News Desk