HW News Marathi
महाराष्ट्र

‘पुण्याला शिथीलता द्या’ ! महापौरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पुणे | राज्यात अजून कोरोनाचं संकट कमी झालेलं नाही. पुण्यात शिथिलता देण्याबाबत जे विधान केलं आहे, त्यासंदर्भात लवकर आदेश काढावेत, अशी मागणी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे. पुणे शहरात शिथीलता देण्यासंदर्भात मी गेल्या १५ दिवसांपासून सरकारकडे पाठपुरावा करतोय, मात्र त्यावर निर्णय का नाही माहीत नाही, अशी खंत मोहोळ यांनी व्यक्त केली आहे.

पुण्याचा पॉझिटिव्हीटी रेट हा ५ टक्क्यांच्या खाली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगलीमध्ये बोलताना, जिथे रुग्णसंख्या कमी आहे, तिथे दुकाने रात्री ८ पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात येईल असं म्हटलं होतं.यावरुन मुरलीधर मोहोळ यांनी पुण्याबाबतही लवकर निर्णय घेण्याची मागणी केली आहे. “पुण्याचा पॉझिटिव्हीटी रेट हा ५ टक्क्यांच्या खाली आहे, त्यामुळे शहर लेव्हल २ मध्ये आहे, तरी शिथीलता दिली जात नाही. राज्य सरकारकडून लसींचा पुरवठा विस्कळीत होत असल्यामुळे शहरातील लसीकरण गेल्या तीन दिवसांपासून बंद आहे”, असंही मुरलीधीर मोहोळ म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज(२ ऑगस्ट) सांगली दौऱ्यावर होते. “राज्यातील दुकाने रात्री ८ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात येत आहे. मात्र, ज्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. तिथेच ही परवानगी असेल. कोरोना रुग्ण संख्या अधिक असलेल्या ठिकाणी निर्बंध कायम असतील”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

मुंबई लोकलला रेड सिग्नल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज(२ ऑगस्ट) सांगली दौऱ्यावर आहेत. सांगलीत अतिवृष्टीमुळे झालेल्या पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तिथे गेले होते. पाहणी करून झाल्यावर त्यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी लोकल ट्रेन बदल महत्वाचा निर्णय सांगितला. “पहिल्या टप्प्यात लोकलचा निर्णय करणं थोडं कठीण आहे. आपण थोड्याथोड्या गोष्टी शिथिल करतोय. त्याचे परिणाम दुष्परिणाम बघत बघत पुढे जातोय.”

वर्क फ्रॉम होम करत असाल तर….

मुख्यमंत्र्यांनी लोकल सुरुवातीसाठी अद्याप हिरवा कंदील दिलेला नाही. ”मला असं वाटतं की मुख्य शहरांमध्ये जिथे कार्यालयं आहेत आणि खासगी कार्यालयं आहेत. मला आजही त्यांना विनंती करायची आहे. कार्यालयांच्या चालकांना व मालकांना की आपण आपल्या कार्यालयीन वेळांची विभागणी करा. मी तर म्हणेल २४ तास उघडं ठेवा, पण कार्यालायत गर्दी होऊ देऊ नका. विशेष करून जिथं इनडोअर अॅक्टिव्हिटी चालतात, तिथे हा धोका जास्त असतो. ओपन एअरला हा कमी असतो. म्हणून मला असं वाटतं जर कार्यालायात आपण शिस्त लावली की आपल्याला जास्तीत जास्त लोक वर्क फ्रॉम होम करू शकत असतील , तर तुम्ही बॅचेस करा. कामाचा वेळा विभागून घ्या. जेणेकरून गर्दी होणार नाही. संसर्ग आटोक्यात राहील व आपलं कामही सुरळीत होईल.” असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या ट्विटवर माणिकराव ठाकरेंनी दिली ही प्रतिक्रिया 

News Desk

अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या एकरकमी लाभाच्या योजनेस १०० कोटींचा निधी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली मान्यता

Aprna

सचिन वाझेंवर होणार शस्त्रक्रिया!

News Desk