HW News Marathi
महाराष्ट्र

राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात खोटी बिले दाखवून झाला घोटाळा, भाजपचा गंभीर आरोप

मुंबई | भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागावर गंभीर आरोप केले आहेत. “राज्य सरकारने बांधकाम विभागात घोटाळा केला. ७० ते ८०कोटी रुपयांची खोटी बिलं कंत्राटदारांना देण्यात आली”, असा थेट आरोप अतुल भातखळकर यांनी केला आहे. भातखळकरांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.

“राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात घोटाळा झाला आहे. खोटी बिलं दाखवण्यात आली. राज्य सरकारने बांधकाम विभागात घोटाळा केला. ७० ते ८० कोटी रुपयांची खोटी बिलं कंत्राटदारांना देण्यात आली. २०१० ते ३० नोव्हेंबर २०२० पर्यंतची ही बिलं आहेत. दोन ते तीन महिन्यात सर्व नियम धाब्यावर बसवत, सगळी बिलं पास केली. या बिलांचं पेमेंट खोटं आहे. ही बिलं पास झाली नव्हती, आता पास कशी झाली? याची चौकशी करायला हवी. ज्या अधिकाऱ्यांनी हा घोटाळा केला, त्यांच्यावर कारवाई करा. अन्यथा १५ दिवसांत कोर्टात जाणार”,असे म्हटले आहे.

एकट्या मुंबईतून ७० केटींची बिलं पास झाली. या घोटाळ्याचे तार नांदेडपर्यंत आहेत, असं म्हणत भातखळकरांनी नाव न घेता अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला. कोरोना काळात पैस नव्हते तर मग बिलं पास कशी केली? ही बिल मंत्र्यांच्या बंगल्यांची, मंत्रालयातील कामांची, सरकारी कामांची बिलं. मुळात ही बिलं खोटी आहेत. ३५ टक्के कमिशनने ही बिलं ठाकरे सरकारने पास केली असा आरोप अतुल भातखळकर यांनी केला आहे.

 

https://twitter.com/BhatkhalkarA/status/1344973381276352514?s=20

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकरी हितासाठी आपण कोणत्याही पक्षाचे असाल तरी एकत्र आलो पाहिजे – मुख्यमंत्री

News Desk

वेल्हा तालुक्याला ‘राजगड’ नाव द्या

swarit

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा परीक्षांवरील बहिष्कार मागे; दीपक केसरकरांची पत्रकार परिषदेत माहिती

Aprna