HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यभरात मुसळधार!

मुंबई चुकीचेच अंदाज वर्तविण्याची ख्याती असलेल्या हवामान खात्याने या वेळी वर्तविलेला अंदाज कधी नव्हे तो बरोबर ठरला आहे. हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे मुंबई, ठाण्यासह रायगड व विदर्भाआज मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे, तर मुंबईसारख्या ठिकाणी लोकलसेवेवर त्याचा परिणाम झाला आहे.

मुंबईत भांडुप व कांजूर या भागात रेल्वे रूळ पाण्याखाली गेले. त्यामुळं लोकल वाहतूक विस्कळीत झाली. मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गावरील वाहतूक उशिरानं सुरू आहे. ठाणे जिल्ह्यासह रायगड, पालघरमध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आहे. रायगड जिल्ह्यातील उरण व चिरनेर येथे गेल्या चार तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. चिरनेर गावातील रस्त्या व गल्ल्यांमध्ये कंबरेएवढं पाणी तुंबलं आहे.

नागपूरसह विदर्भातल्या बहुतेक जिल्ह्यांना पावसानं झोडपून काढलं आहे. नागपुरात गेल्या २४ तासांत १४१.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. अमरावती, वर्धा, भंडारा, यवतमाळ, गोंदिया, अकोलामध्ये पावसानं चांगली हजेरी लावलीय. नागपूर शहरात काही ठिकाणी पाणी तुंबल्यानं वाहतूक वळविण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पक्षवाढीसाठी अविरत प्रयत्न करून पक्षश्रेष्ठींचा विश्वास सार्थ ठरवेन !

News Desk

हा महाराष्ट्र आहे, पुन्हा पाय घसरला तर मोडून पडाल, सामनातून मोदी सरकारवर टीका

News Desk

‘रस्त्यावर लोळणाऱ्यांची दातखिळी बसली का?’, भाई जगतापांनी पडळकरांना डिवचले

News Desk
देश / विदेश

साडेतीनशे कोटी रुपयांचा फाइन वसूल

News Desk

नवी दिल्ली- देशातील सर्वात मोठ्या स्टेट बँक ऑफ इंडियांने ग्राहकांच्या खिशातून सुमारे साडेतीनशे कोटी रुपये वसूल केले आहेत. हे पैसे केवळ देवाण-घेवाणपोटी वसूल करण्यात आलेल्या दंडातून मिळाले, हे विशेष. तुमच्या खात्यात तीन हजारांपेक्षा कमी रक्कम असेल तर तुम्हाला दंड द्यावा लागतो. तसेच इतर बँकेच्या एटीएममधून पैसे काढल्यास पैसे आकारले जातात. मेट्रो शहरात दीडशे रुपयापर्यंत दंड आकारला जातो. तुम्ही पैसे काढा किंवा काढू नका, तुम्हाला भूर्दंड भरावाच लागणार हे नवे बँकींक धोरण असल्याचे सध्या चित्र आहे. एकीकके शासन बँक व्यवहार करण्यास प्रोत्सहन देत असून दुसरीकडे ग्राहकांच्या खिशाला कात्री लावण्याचा धंदी सुरू आहे. एकट्या एसबीआय बँकेने ग्राहकांकडून दंडापोटी साडेतीनशे कोटी वसूल केले आहेत. इतर खासगी बँकांची ही रक्कमो कोट्यवधींच्या घरात जाण्याची शक्यता आहे.

Related posts

मोठ्या शहरातील महामार्गावर चालवता येणार वाइनशॉप, बिअरबार

News Desk

1993 स्फोट; अबू सालेम,करिमुल्लाला जन्मठेप, दोन लाख दंड ; ताहिर, फिरोजला फाशी

News Desk

रश्मी शुक्लांची कारस्थाने पवारांपासून सर्वांना माहिती होती, संजय राऊतांचे मोठे वक्तव्य

News Desk