HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यभरात मुसळधार!

मुंबई चुकीचेच अंदाज वर्तविण्याची ख्याती असलेल्या हवामान खात्याने या वेळी वर्तविलेला अंदाज कधी नव्हे तो बरोबर ठरला आहे. हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे मुंबई, ठाण्यासह रायगड व विदर्भाआज मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे, तर मुंबईसारख्या ठिकाणी लोकलसेवेवर त्याचा परिणाम झाला आहे.

मुंबईत भांडुप व कांजूर या भागात रेल्वे रूळ पाण्याखाली गेले. त्यामुळं लोकल वाहतूक विस्कळीत झाली. मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गावरील वाहतूक उशिरानं सुरू आहे. ठाणे जिल्ह्यासह रायगड, पालघरमध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आहे. रायगड जिल्ह्यातील उरण व चिरनेर येथे गेल्या चार तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. चिरनेर गावातील रस्त्या व गल्ल्यांमध्ये कंबरेएवढं पाणी तुंबलं आहे.

नागपूरसह विदर्भातल्या बहुतेक जिल्ह्यांना पावसानं झोडपून काढलं आहे. नागपुरात गेल्या २४ तासांत १४१.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. अमरावती, वर्धा, भंडारा, यवतमाळ, गोंदिया, अकोलामध्ये पावसानं चांगली हजेरी लावलीय. नागपूर शहरात काही ठिकाणी पाणी तुंबल्यानं वाहतूक वळविण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडा, मुख्यमंत्र्यांचे नागरिकांना आवाहन

News Desk

नाथाभाऊ पक्ष सोडून कुठेही जाणार नाहीत, चंद्रकांत पाटलांचा विश्वास

News Desk

नाना पटोलेंच्या कार्यक्रमात नितीन राऊत अनुपस्थित!

News Desk