HW News Marathi
देश / विदेश

रश्मी शुक्लांची कारस्थाने पवारांपासून सर्वांना माहिती होती, संजय राऊतांचे मोठे वक्तव्य

नवी दिल्ली | एकदा हात पोळूनही महाविकासआघाडीच्या नेत्यांनी रश्मी शुक्ला यांच्यावर इतका विश्वास कसा ठेवला, याचं आश्चर्य वाटतं. राजकारणात किंवा प्रशासनातील अधिकाऱ्यांवर इतका विश्वास कधीही ठेवायचा नसतो. खांद्यावर विश्वासाने ठेवलेली मान हे अधिकारी कधीही बगलेत दाबू शकतात, हे आताच्या उदाहरणावरु दिसून आले आहे. अत्यंत सहजपणे सत्तेत जाऊन बसलेल्या लोकांनी या सगळ्या अनुभवानंतर तरी शहाणपण शिकावे, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले. आज (२६ मार्च) दिल्लीत ते पत्रकारांशी संवाद साधत होते.

यावेळी फोन टॅपिंग प्रकरणावरुन संजय राऊत यांनी महाविकासआघाडीच्या नेत्यांना कानपिचक्या दिल्या. सत्तास्थापनेच्या घडामोडी सुरु असताना रश्मी शुक्ला यांनी लहान पक्षाच्या आमदारांना भाजपसोबत जाण्यासाठी धमकावले होते. तरीही महाविकासआघाडीची सत्ता आल्यावर पाच ते सहा महिने त्या पदावर कशा राहिल्या, याचं मला आश्चर्य वाटतं. एकदा हात पोळल्यानंतर कोणावर इतका विश्वास ठेवायचा नसतो. शरद पवारही याच मताचे आहेत. रश्मी शुक्ला यांच्यावर वेळीच कारवाई केली असती तर विरोधी पक्षनेत्यांना दिल्लीत कागद फलकावयची संधी मिळाली नसती, असे संजय राऊत यांनी म्हटले. तसेच, शरद पवारांना सगळं माहित होतं असं वक्तव्यही त्यांनी केले आहे.

ठाकरे सरकार महाराष्ट्रात येत आहे, त्यांच्या सोबत जाऊ नये. तुमच्या फाईल तयार आहेत. यड्रावकरांपासून अनेक आमदारांना रश्मी शुक्ला धमक्या देत होत्या. हे सर्वांना माहिती होते. भाजपा सरकारसोबत जा, असे इशारे पोलीस खात्याकडून दिले जात होते. शुक्लांना महाविकास आघाडीच्या सरकारने तरीही ६ महिने पदावर ठेवले होते याचे मला आश्चर्य वाटते, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले.

पोलिस खात्यातील असे चार-पाच अधिकारी आमच्या, शरद पवारांच्या नजरेत आले होते. त्यांच्यावर विश्वास कसा ठेवला असा सवाल राऊतांनी व्यक्त केला. बाळासाहेबांनीदेखील अधिकाऱ्यांच्या मदतीने सरकार चालविता येत नाही, असे सांगितले होते. युतीसरकारच्या काळातही तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशींना बाळासाहेबांनी दोन अधिकाऱ्यांना सुटीवर पाठविण्यास सांगितले होते, असेही राऊत म्हणाले. वेळीच या अधिकाऱ्यांना बाजुला केले असते तर देवेंद्र फडणवीस ज्या फाईल घेऊन दिल्लीला गेले होते, ते झाले नसते, असेही राऊतांनी सांगितले.

सीताराम कुंटेंनी काल एक अहवाल दिला आहे. त्यामध्ये फोन टॅपिंगबाबत मोठे खुलासे आहेत. भाजपाला फायदा होईल, राजकीय फायद्यासाठी हे अधिकारी आमदारांचेच नाही तर खासदार आणि पत्रकारांचेही फोन टॅप करत होते. पत्रकारांना काय माहिती आहे हे त्यांना हवे होते. शरद पवारांचे फोन टॅप केले गेले, ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले. सरकार जे बसलेय त्यांना या गोष्टीचे गांभीर्य समजायला हवे. अधिकाऱ्यांच्या खांद्यावर मान ठेवून राज्य करता येत नाही. ती एपीआयपासून पोलीस अधिऱ्यापर्यंत कशी बगलेत दबली जाते ते पाहिलेय. सरकारने यातून बोध घ्यावा, असा इशारा राऊत यांनी दिला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फेसबुकचा सर्वेसर्वा झाला दुसऱ्यांदा झाला बाप.. मुलींला पत्रातून दिल्या शुभेच्छा

News Desk

कैफने केले इम्रान खान यांना क्लीन बोल्ड

News Desk

चित्रपटगृहात राष्ट्रगीताची सक्ती नाही- सुप्रिम कोर्ट

News Desk