HW News Marathi
महाराष्ट्र

राहुल गांधींनी दलित मुलीशी लग्न करावे: आठवले

अकोला : गुजरात निवडणुकीत राहुल गांधींसोबत असलेल्या कुणाचाही काहीच परिणाम होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींपुढे कुणाचाही टिकाव लागणार नाही. जनतेचा कौल मोदींनाच मिळेल, असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी केला. विविध कार्यक्रमानिमित्त अकोल्यात आल्यानंतर रामदास आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गुजरात निवडणुकीबद्दल त्यांना विचारले असता ते म्हणाले, भारिप-बमसंचे नेते अ?ॅड. प्रकाश आंबेडकर यांनीही गुजरातमध्ये तळ ठोकला. त्याचवेळी आपणही तेथे प्रचारात उडी घेणार आहोत. त्यामुळे अ‍ॅड. आंबेडकर यांचा प्रभाव मोडीत निघेल, असा दावाही त्यांनी केला.

भाजपाचे स्वतंत्र विदर्भ निर्मितीचे धोरण आहे. विदर्भ वेगळा करण्याचा मोठेपणा त्यांनी दाखवावा, अशी पक्षाची मागणी आहे. विदर्भ वेगळा झाल्यानंतर दलित, बहुजन, अल्पसंख्यांकांची सत्ता येऊ शकते, असे ते म्हणाले. राहुल गांधींनी दलित मुलीशी लग्न करावे,कधी-कधी दलितांच्या घरी जेवण करणा-या राहुल गांधी यांनी दलित समाजातील मुलीशी विवाह करून नवा पायंडा पाडावा, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आर्यन खानकडे कोणतेही ड्रग्ज नव्हते, SIT समितीच्या तपासात उघड

Aprna

“भाजप सरकारच्या काळात दंगली होत नाही,” बोंडेंचं मलिकांच्या आरोपाला प्रत्युत्तर

News Desk

“लोकलने लोकं प्रवास करतात, वरळीत पब सुरु असतो मग परीक्षा पण झाल्याच असत्या”, भाजपचा टोला

News Desk