HW News Marathi
महाराष्ट्र

राहुल गांधींनी दलित मुलीशी लग्न करावे: आठवले

अकोला : गुजरात निवडणुकीत राहुल गांधींसोबत असलेल्या कुणाचाही काहीच परिणाम होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींपुढे कुणाचाही टिकाव लागणार नाही. जनतेचा कौल मोदींनाच मिळेल, असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी केला. विविध कार्यक्रमानिमित्त अकोल्यात आल्यानंतर रामदास आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गुजरात निवडणुकीबद्दल त्यांना विचारले असता ते म्हणाले, भारिप-बमसंचे नेते अ?ॅड. प्रकाश आंबेडकर यांनीही गुजरातमध्ये तळ ठोकला. त्याचवेळी आपणही तेथे प्रचारात उडी घेणार आहोत. त्यामुळे अ‍ॅड. आंबेडकर यांचा प्रभाव मोडीत निघेल, असा दावाही त्यांनी केला.

भाजपाचे स्वतंत्र विदर्भ निर्मितीचे धोरण आहे. विदर्भ वेगळा करण्याचा मोठेपणा त्यांनी दाखवावा, अशी पक्षाची मागणी आहे. विदर्भ वेगळा झाल्यानंतर दलित, बहुजन, अल्पसंख्यांकांची सत्ता येऊ शकते, असे ते म्हणाले. राहुल गांधींनी दलित मुलीशी लग्न करावे,कधी-कधी दलितांच्या घरी जेवण करणा-या राहुल गांधी यांनी दलित समाजातील मुलीशी विवाह करून नवा पायंडा पाडावा, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

एसटी महामंडळाचा ३० टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव

News Desk

निवडणुकीच्या तयारीला लागा-शरद पवार यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

News Desk

राणेंच्या बंगल्याबाहेर आंदोलन केल्यावर युवासैनिकांना उद्धव ठाकरेंची शाबासकी!

News Desk
Uncategorized

दारूबंदी असताना दारू पिऊन पाच ठार

News Desk

पाटणा: संपूर्ण बिहार राज्यात सध्या दारूबंदी लागु आहे. परंतु रोहतास येथे विषारी दारू प्यायल्याने ५ जणांचा मृत्यू झाला तर अनेकांची प्रकृती गंभीर आहे. अवैधरित्या विक्री होणा-या दारूमुळे हे बळी गेल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एकाला निलंबित करण्यात आले आहे.

Related posts

अमरनाथ यात्रेत अडकले महाराष्ट्रातील भाविक

News Desk

Aprna

चर्नी रोड स्थानक पूल दुरुस्तीपर्यंत तात्पुरती तिकीट खिडकी तातडीने सुरु करावी! – पालकमंत्री दीपक केसरकर

Aprna