HW News Marathi
महाराष्ट्र

तर निर्भयासारखी प्रकरणे घडतील…

मुंबई | मुंबईतील नाईटलाईफच्या प्रस्तावाची मागणी पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली होती. या प्रस्तावासंदर्भात अनेत बैठकी झाल्या. बैठकीत प्रायोगिक तत्वावर नाइटलाइफ सुरु करण्याची संमती देण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र सरकारच्या या निर्णयावर भाजपाकडून विरोध करण्यात येत आहे. त्यातच मुंबईत नाईटलाइफ सुरु केल्यास हजारो निर्भयासारखी प्रकरणं घडतील असा दावा भाजपाचे नेते राज पुरोहित यांनी केला आहे.

मुंबईतील मॉल्स, हॉटेल्स आणि पब्ज २४ तास खुले ठेवण्याचा प्रस्ताव आदित्य ठाकरे यांनी मांडला आहे. मात्र मुंबईत मद्य संस्कृती लोकप्रिय झाल्यास महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. तसेच नाईटलाइफमुळे हजारो निर्भयासारख्या घटना घडतील असा दावाही राज पुरोहित यांनी केला आहे. तसेच नाईटलाईफ ही आपली भारतीय संस्कृती नव्हे असंही राज पुरोहित यांनी सांगितले.

येत्या २६ जानेवारीपासून मुंबईत नाईट लाईफचा प्रयोग केला जाणार असल्याचं म्हटलं आहे. नरिमन पॉइंट, काळा घोडा, वांद्रे-कुर्ला संकुल अशा अनिवासी क्षेत्रातून याची सुरुवात होईल. या भागातील मॉल, दुकाने, हॉटेल्स 24 तास खुली ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोविडमुक्त गाव अभियान पुणे विभागातही राबवावे – अजित पवार

News Desk

नांदेड : कुसूमताई चव्हाण महिला भूषण पुरस्कार जाहिर

News Desk

“सचिन वाझे प्रकरणामुळे सरकार अडचणीत येईल मी सांगितलं होतं”,राऊतांचा गौफ्यस्फोट

News Desk