HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यपालांचा सल्ला मानत राज ठाकरेंनी केला शरद पवारांना फोन!

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल (२९ ऑक्टोबर) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. या भेटीत राज्यपालांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी बोला असा सल्ला दिला होता. त्यानुसार आज अखेर राज यांनी आज (३० ऑक्टोबर) राज्यपालांचा सल्ला मान्य करत शरद पवारांशी फोनवर चर्चा केली आहे. दूध उत्पादक शेतकरी आणि वाढीव वीज बिलाच्या मुद्यांवर आज राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्याशी फोनवर चर्चा केली. यावेळी राज यांनी सर्वसामन्याच्या वीज बिलात झालेली वाढ कमी करण्यात यावी, याबद्दल चर्चा केली आहे.

राज ठाकरे यांचा शरद पवारांना फोन गेला. या फोनवरील चर्चेत भेटीबाबत काही अद्याप ठरले नाही आहे. राज्यपालांनी सल्ला दिला त्यामुळे राठ ठाकरेंनी शरद पवारांना फोन केला असे सांगितले जात आहे. त्यामुळे शरद पवारांशी चर्चा झाल्यानंतर राज ठाकरे बोलल्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांशी पण चर्चा करणार का? हे पाहण महत्वाचे असणार आहे.

राज्यात सध्या कोरोमामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ज्या समस्या लोकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे मांडल्या. त्याच थेट राज ठाकरेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे मांडल्या आहेत. काल (२९ ऑक्टोबर) राज ठाकरेंनी राज्यपालांची भेट घेतली. यात जनतेला येत असलेल्या वाढीव वीज बिलासंदर्भात भेट घेतल्याची माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली. वाढीव वीज बिलासंदर्भात सरकारने तातडीने निर्णय घेऊन जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली. राजभवनात राज्यपालांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनीही माहिती दिली आहे.

वीजबिलांचा विषय मनसे लावून धरत आहे. अनेक ठिकाणी आंदोलनं करत आहे. अदानी, वेस्टची लोकं भेटली. आम्ही बिल कमी करु शकतो मात्र एनईआरसी कमी करावा लागेल. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी बोलणं झालं. लवकरात लवकर निर्णय घेऊ असं ते सांगतात. परंतु अद्याप निर्णय झालेला नाही. राज्यपालांशी बोललो, ते म्हणाले शरद पवारांचा सल्ला घ्या. मी शरद पवारांना भेटणार आहे. हा विषय राज्य सरकारला माहित आहे, मग हे प्रकरण कशात अडकलंय हे कळत नाही. त्यासाठी सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा. त्याच संदर्भात पहिलं निवेदन राज्यपालांना भेटून दिलं आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

“मी शरद पवार यांच्याशी बोलणार आहे, फोनवरुन बोलेन किंवा प्रत्यक्ष भेटून बोलेन. वेळ पडल्या मुख्यमंत्र्यांची भेट घेईन”, असेही त्यांनी म्हटले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतमालाला योग्य हमीभाव दिला नाही तर व्यापाऱ्यांवर राज्य सरकार चालवणार खटला – बाळासाहेब थोरात

News Desk

सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसशी संग केल्यामुळेच शिवसेनेला आता अयोध्येला जाण्याची गरज! – प्रविण दरेकर

Aprna

“स्वतंत्र विदर्भ होत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही, त्याचं काय झालं”, थोरातांचा फडणवीसांना सवाल

News Desk