HW News Marathi
महाराष्ट्र

राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली ‘ही’ महत्त्वाची बाब !

मुंबई | देशात, राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा हा वाढत आहे. मात्र, कोरोनातून मुक्त होणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. मात्र, याकडे फारसे लक्ष हे सरकारने आणि माध्यमांनी दिले नाही असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातुन सगळ्यांच्या निदर्शनास आणले आहे.

जे डॉक्टर कोरोनातून लोकांना बरे करण्यासाठी इतकी मेहनत घेत आहेत, जर कोरोनातून मुक्त होणाऱ्यांचा आकडाही दाखवला तर त्या डॉक्टरांनाही दिलासा मिळेल, असेही त्यांनी यात लिहिले आहे. त्यामूळे राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने याबाबतीतील एक न्यूज बुलेटिन काढावे असा सल्लाही यावेळी राज ठाकरे यांनी दिला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी काल (१५ एप्रिल) बोलून त्यांनी या महत्त्वाच्या बाबी निदर्शनास आणून दिल्या अशी माहितीही त्यांनी दिली.

दरम्यान, कोरोनाच्या या आजारातून ६ महिन्यांची एक चिमूकली बरी झाली त्याला जास्त महत्त्व दिले गेले नाही असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. आणि टी.बी सारख्या संसर्गजन्य आजाराच्या व्यक्तीला आपण वाळीत टाकत नाही मग कोरोना झालेल्या रुग्णाला वाळीत टाकायच्या घटना का घडत आहेत असा सवालही यावेळी त्यांनी उपस्थित केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

परिवहन मंत्र्यांच्या महामंडळातील सचिन वाझे कोण? भाजपचा सवाल!

News Desk

गंगेच्या किनारी मृतदेहांची विटंबना, महाराष्ट्र मॉडेल लागू करणार का, संजय राऊत गरजले!

News Desk

इपिलेप्सी आजाराबाबत जनजागृती करण्याचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचे आवाहन

Aprna