HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवार भाषणाची सुरुवात शिवाजी महाराजांच्या नावानं का करत नाहीत? राज ठाकरेंचा बोचरा सवाल

पुणे | मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज(२० ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. मग छत्रपती शिवाजी महाराजांचा का नाही? मूळ विचार जर आपण पाहिला तर तो छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आहे’, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. पुण्यात आज(२० ऑगस्ट) राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली असून त्यात ते बोलत होते.

मग छत्रपती शिवाजी महाराजांचा का नाही?

राज ठाकरे यांनी त्यांचा एक जुना किस्सा सांगितलं ज्यात त्यांनी शरद पवारांची मुलखात घेतली होती. त्यावरून ते म्हणाले, “‘शरद पवार यांची भव्य मुलाखत घेतली तेव्हा मी त्यांना प्रश्न विचारला होता की, महाराष्ट्राचं एक हुक, म्हणजे ज्यातून सर्वजण एकत्र येतात, असं काय वाटतं तुम्हाला? मला एक साधारण अंदाज होता की ते काय उत्तर देतील. त्या प्रमाणे त्यांनी उत्तर दिलं की छत्रपती शिवाजी महाराज. मग मी त्यांना विचारलं की छत्रपती शिवाजी महाराज हे जर आहे, तर तुम्ही तुमच्या भाषणाची सुरुवात किंवा तुमचा पक्ष हा शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार पुढे घेऊन जाणार. मग छत्रपती शिवाजी महाराजांचा का नाही? मूळ विचार जर आपण पाहिला तर तो छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आहे’, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मी यशवंतराव वाचले

यावेळी राज ठाकरेंनी बोलताना राष्ट्रवादीला टोला लगावला आहे. आधी प्रत्येकाला स्वत:च्या जातीबद्दल अभिमान होता. पण अन्य जातींबद्दल द्वेष राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर निर्माण झाला, असं मी एकटाच बोललो. मला प्रबोधनकार वाचण्याचा सल्ला देण्यात आला. मी सर्वांची पुस्तकं वाचलेत. प्रबोधनकरांचं संदर्भ त्या त्या काळातले होते. माझ्या आजोबांचं लिखाण आपल्याला हवं तसं घ्यायचं असं चालणार नाही. मी यशवंतरावांचंही वाचलं आहे, त्यांचेही मत काय होतं हेही मला माहिती आहे, असा जोरदार टोला राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लगावला आहे.

माझा जन्म हा कडवट मराठी

“मनसेचा सध्याचा झेंडा पक्षस्थापनेपासूनच माझ्या डोक्यात होता. तो मला सतत आणायचा होता. तो कधी आणायचा हे सगळं सुरु होतं. त्यानंतर एके दिवशी तो झेंडा आणायचा हे ठरवलं. ही गोष्ट पहिल्यापासून माझ्या डोक्यात होती. माझा जन्म हा कडवट मराठी आणि अत्यंत कडवट हिंदुत्वावादी घरात झाला आहे. त्यामुळे माझ्यावर झालेले संस्कार तेच आहेत. हे लक्षात ठेवावे,” असं ठाकरे यांनी म्हटलंय.

ते शिवशाहीर म्हणून भेटतो

आजकाल राज ठाकरे आणि शिवशाहीर बाबा साहेब पुरंदरे यांच्या भेटी वाढल्या आहेत. यावर देखील राज ठाकरेंनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे. या भेटीनंतर त्यांच्यावर अनेकांनी टीका केली. या टीकेवर बोलताना राज यांनी पुरंदरे यांच्याकडे मी इतिहास संशोधक म्हणून जातो, असं म्हटलंय . ” मी बाबासाहेब पुरंदरेंना भेटतो. ते शिवशाहीर म्हणून भेटतो. ब्राह्मण म्हणून भेटत नाही. शरद पवारांना भेटतो तेव्हा मराठा म्हणून भेटत नाही. तुम्हाला भेटतो तेव्हा तुमची जात पाहून भेटत नाही. आपण यातून बाहेर पडलं पाहिजे,” अशा शब्दांत राज ठाकरे यांनी टीकाकारांना उत्तर दिलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई आणि पुणे दोन्ही शहरात ‘सन्मान मोर्चा’ला परवानगी नसताना सुद्धा मोर्चा काढला

News Desk

मुंबईची बत्ती गुल झाल्यानंतर आता केंद्रीय अधिकाऱ्यांचे पथक मुंबईला भेट देणार

News Desk

शाळेत ४० मिनीटांचे ४ तासच होणार – वर्षा गायकवाड

News Desk