HW News Marathi
महाराष्ट्र

पक्ष बांधणीसाठी राज ठाकरेंचा दौरा 

पुणे | महापालिकेच्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे तब्बल २९ नगरसेवक निवडून आले होते. मात्र त्यानंतर पक्षाची लोकप्रियता घसरण्यास सुरुवात झाली. सन २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत पक्षाचे अवघे दोन नगरसेवक निवडून आले. या दरम्यान, पक्षातील अंतर्गत वाद, मतभेद सातत्याने पुढे आले

येणारी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्याच्या दृष्टीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात लक्ष केंद्रित केले आहे. पक्ष बांधणी करण्यासाठी विविध स्तरावरील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करणार असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे ते त्यासाठी मंगळवार आणि बुधवारी (दि. ३० आणि ३१ जानेवारी) पुन्हा पुणे दौऱ्यावर जाणार आहेत.

ऑगस्ट महिन्यात पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांसाठी राज ठाकरे यांनी पुणे दौरा केला होता. त्या वेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत पक्षाची प्रतिमा वाढविणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देणार असल्याचे जाहीर केले होते. मनसे नेते शिरीष सावंत, संदीप देशपांडे तसेच उपाध्यक्ष प्रमोद पाटील हे या वेळी उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने राज ठाकरे हे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्याची शक्यता आहे. त्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे लक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्याकडे लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी फडणवीसांचा सरकारला ‘हा’ सल्ला

News Desk

बॉलिवुड ड्रग्स प्रकरण : अभिनेत्री दीपिका पादुकोण एनसीबी कार्यालयात दाखल 

News Desk

विधीमंडळातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोना टेस्ट बंधनकारक

News Desk
देश / विदेश

आता बंगाल उपसागराजवळ चीनकडून बंदर उभारले जाणार

News Desk

नवी दिल्ली | चीन आता म्यानमारमध्ये मोठे बंदर उंभरणार आहे. बंगालच्या उपसागराजवळ हे बंदर उभारले जाणार आहे. चीन त्यांच्या वन बेल्ट वन रोड या प्रकल्पाअंतर्गत म्यानमारमधील क्याकप्यू शहराजवळ खोल समुद्रात बंदर उभारणार आहे. चीनकडून म्यानमारमध्ये उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पात चीनने ७० टक्के आणि म्यानमारने ३० टक्के गुंतवणूक केल्याची माहिती मिळत आहे.

भारताच्या शेजारील देशांमध्ये चीनकडून वाढणाऱ्या गुंतवणुकीमुळे भारताच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. याआधी चीनने पाकिस्तानमध्ये ग्वादर बंदर उभारले आहे. तर श्रीलंकेचे महत्वाचे असे हंबनटोटा बंदर ९९ वर्षाच्या लीजवर चीनकडेच आहे. बांगलादेशमधील चितगाव बंदरचा देखील चीनने विकास केला आहे. आता चीनने म्यानमारमध्ये एक मोठे बंदर उभारणार आहे.

Related posts

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची ‘मन की बात’ वेळीच समजून घेतली असती तर…

News Desk

जनावरांची खरेदी विक्री करण्याबाबत केंद्र नरमले

News Desk

मनमोहन सिंग यांच्या बंधूचा काँग्रेसला रामराम, ‘आप’मध्ये प्रवेश

News Desk