HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

राज ठाकरे यांचा राज्यपाल कोश्यारींना इशारा, मराठी माणसाला डिवचू नका!

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari controversial statement) आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.कोश्यारी यांनी वादग्रस्त विधान करताना म्हटलेय, जर गुजराती आणि राजस्थानी नसते तर मुंबईचे आर्थिक महत्व कसे निर्माण झाले असते. यावरुन आता राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी देखील राज्यपालांना खडेबोल सुनावले आहेत. महाराष्ट्राचा अपमान केला आहे असं म्हणत विरोधकांसह सामान्य नागरिकांनी त्यांच्यावर सवाल उपस्थित केले आहेत. मराठी माणसाला डिवचू नका! आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल माहिती नसेल तर बोलत जाऊ नका, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज्यपालांनी नको त्या गोष्टीत नाक खुपसू नये असं म्हणत मनसेनं (MNS) भगतसिंह कोश्यारी यांना इशारा दिला आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली

 

“ज्या गोष्टीचा आपल्याला अर्थ आणि इतिहास माहित नाही तर नको त्या गोष्टीत राज्यपाल यांनी नाक खुपसू नये”

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

परप्रांतीय मासे विक्रेत्यांना हटवा, कोळी भगिनींची राज ठाकरेंकडे साद

News Desk

#LokSabhaElections2019 : मला फक्त समुद्राची लाट माहित आहे !

News Desk

बांदेकरांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा

News Desk