HW News Marathi
Covid-19

अधिकाऱ्यांच्या आधीच राजेश टोपे हजर, नवे जिल्हाधिकारी पळत बैठकीला उपस्थित

कोल्हापूर | कोरोनाचा संकट पुन्हा राज्यात सुरु झालंय. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे हे सध्या दौऱ्यावर असून कोरोना संख्येचा आढावा घेत आहेत. आज (१६ जुलै) ते जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत आहेत. ही बैठक सकाळीच सुरू झाली. आरोग्यमंत्री राजेश टोपे नेमक्या कोणकोणत्या सूचना अधिकाऱ्यांना देतात हे पाहावे लागेल. दरम्यान ही बैठक नियोजित नसल्याने अधिकाऱ्यांच्या आधीच आरोग्य मंत्री राजेश टोपे जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले. त्यामुळे नव्याने पदभार स्वीकारलेले जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त कादंबरी बलकावडे आणि जिल्हा परिषद सीईओ संजय चव्हाण हे धावतच जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले आहेत.

भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात भेट

भाजप अधिकार्यांनीही टोपेंची भेट घेतली आहे. दरम्यान भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री टोपे यांची भेट घेऊन निवेदन दिलं. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आपण आढावा बैठक घेऊन २० दिवस झाले तरी रुग्णवाढ थांबलेली नाही. हे प्रशासनाचे अपयश आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात पालकमंत्री आणि मालकमंत्री अशी अवस्था असून एकाने बैठक घेतली की दुसरा बैठक घेतो अशी टीका पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे नाव न घेता शिष्टमंडळाने टोपे यांच्यासमोर केली. जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक ती सर्व उपायोजना कराव्यात अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

कोरोना परिस्थिती अजूनही नियंत्रणात नाही

जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती अजूनही नियंत्रणात येत नसल्याने याची दखल आता थेट केंद्राने घेतली आहे. केंद्राचं एक पथक काल कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होतं. या पथकाने जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढाव घेतला. चार सदस्यीय हे पथक दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनाशी सोबत घेऊन केलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. त्याचबरोबर काही खाजगी हॉस्पिटल, त्याचबरोबर लसीकरण केंद्रांना देखील भेटी देणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रातील कांदा खरेदीची मर्यादा ५० हजार मेट्रीक टनांपर्यंत वाढवावी

News Desk

औरंगाबादमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा ९०० वर

News Desk

महाराष्ट्र काँग्रेसने ४ हजार ६२७ स्थलांतरित मंजुराचा उचलला खर्च

News Desk