HW News Marathi
Covid-19

“महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढणार का?”, आरोग्यमंत्री म्हणतात…

मुंबई | राज्यात गेल्या १-२ दिवसांपासून नव्या कोरोना रुग्ण संख्येत घट होत होती आणि कोरोनामुक्त होणाऱ्यांचा आलेख वाढत आहे. दरम्यान, सध्या राज्यात १५ मे पर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. या आधी परिस्थिती नियंत्रणात न आल्याने ठाकरे सरकारने ३० एप्रिलपर्यंत लागू केलेला लॉकडाउन नंतर १५ एप्रिलपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला होता.

दरम्यान राज्यात रुग्णसंख्या नियंत्रणात येताना दिसत असली तरी अद्यापही लस तसंच आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे लॉकडाउन ३१ मे पर्यंत वाढवण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाउनसंबंधी भाष्य केलं आहे. ते मुंबईत आज (११ मे) पत्रकार परिषदेत बोलत होते.

काय म्हणाले राजेश टोपे?

“उद्या कॅबिनेट असण्याती संभावना आहे. अद्याप त्यासंदर्भात सूचना आलेली नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसंच कॅबिनेटच्या सदस्यांशी चर्चा करुन अंतिम निर्णय घेतला जाईल. लॉकडाउन किंवा ब्रेक दी चेनअंतर्गत जे निर्बंध लागू करण्यात आले आहेत ते वाढवायचे की कमी करायचे या सर्व गोष्टींसंदर्भातील निर्णय घेतले जाऊ शकतात,” असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान यावेळी त्यांनी लगेच पूर्ण लॉकडाउन हटवला जाईल अशी अपेक्षा करु नका म्हटलं आहे. “सगळं लगेच १०० टक्के कमी होणार नाही. निर्बंध हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न होऊ शकेल असे माझा अंदाज आहे. . पण पूर्ण लॉकडाउन काढून १०० टक्के मोकळीक होईल असं होणार नाही. चर्चा होईल आणि मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील,” असं त्यांनी सांगितलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशातील ‘या’ ६ कोविड संवेदनशील राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांना कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट असणे बंधनकारक

News Desk

OBC आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय घ्या, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करू । प्रीतम मुंडे

News Desk

देशात कोरोना निर्बंध ३१ ऑगस्टपर्यंत, केंद्राच्या राज्यांना सूचना

News Desk