HW News Marathi
महाराष्ट्र

मंदिरात जाऊन दर्शन घेणे प्रत्येकाच्या श्रध्देचा भाग यावरून राजकारण करू नये !

जालना | राज्यात सर्व धार्मिक स्थळे सुरू करण्यावरून विरोधी पक्ष आक्रमक झालेला दिसत आहे. यावरूनच काल भाजपने घंटानाद आंदोलन केले होते. यावरूनच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी टीका केली आहे. मंदिरात जाऊन देवदर्शन घेणं, हा प्रत्येकाच्या श्रध्देचा भाग आहे. मात्र, यात कोणी राजकारण करु नये, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी भाजपच्या मंदिरं उघडा’ आंदोलनावरुन टीका केली आहे.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे टप्प्याटप्प्याने एक-एक खुले करत आहेत, तेच योग्य आहे. जर अचानक रुग्णांची संख्या वाढली, तर रुग्णांना दवाखान्यात जागा मिळणार नाही, अशी भीती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी व्यक्त केली.“विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण महाराष्ट्रात फिरावे. बारामतीमध्ये ते फिरत आहेत. मात्र, राजकारण करु नये, जरा नागपूरमध्ये लक्ष घालावे”, असं म्हणत राजेश टोपेंनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

कोरोनाच्या संसर्गामुळे राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आणि सर्व मंदिरे बंद करण्यात आली. मात्र, केंद्र सरकारने घोषित केलेल्या अनलॉकनुसार धार्मिक स्थळे उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. यावर देशातील विविध राज्यांमध्ये मंदिरं उघडण्यात आली आहेत. मात्र, महाराष्ट्रात अजूनही धार्मिक स्थळे बंद आहेत. धार्मिक स्थळे अनलॉक प्रक्रियेत उघडी करावी, यासाठी भाजपने आज राज्यभर ‘उद्धवा उघड दार’ हे आंदोलन केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता शरद पवार, संजय राऊत यांची तोंडं शिवली आहेत का? भाजपचा सवाल

News Desk

वानखेडेंसह नवाब मलिकांचीही न्यायालयीन चौकशी करा, प्रसाद लाड यांची मागणी

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यातील बर्ड फ्ल्यू परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेणार

News Desk