HW News Marathi
Covid-19

आरोग्यमंत्र्यांना जेवायलाही पुरेसा वेळ मिळेना…गाडीत बसूनच राजेश टोपेंचा अल्पोपहार!

औरंगाबाद | महाराष्ट्रातील कोरोना स्थिती गंभीर असून सरकार, आरोग्य यंत्रणा ही स्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे सध्या राज्याला पुन्हा फीट बनवण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळेच टोपेंना आपल्या बिझी शेड्यूलमधून जेवणासाठीही वेळ मिळत नसल्याचे दिसून येत आहे. त्याचे कारण असे की, औरंगाबाद विमानतळावर गाडीत बसून अल्पोपहार घेतानाचा राजेश टोपे यांचा व्हिडीओ समोर आला आहे.

कोरोनाच्या संकट काळात राज्याची आरोग्य व्यवस्था सांभाळताना राजेश टोपेंच्या स्वतःच्या आरोग्याची मात्र हेळसांड होते की काय, अशी शंका कोणाच्याही मनात येईल. कारण टोपेंना वेळी-अवेळी गाडीत बसून जेवण करावं लागत असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

मुंबईला जाण्यासाठी निघालेल्या राजेश टोपे यांनी वेळ वाचावा यासाठी औरंगाबाद विमानतळावर गाडीत बसून अल्पोपहार घेतला. त्याचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. राजेश टोपे हे पर्याय नसल्याचंही सांगतात. त्यानंतर औरंगाबादहून ते मुंबईला विमानाने रवाना झाले. राजेश टोपे यांच्या या कर्तव्यतत्परतेचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आई शारदा टोपे यांची कोरोनाच्या कठीण काळात म्हणजेच २०२० मध्ये तब्येत अतिशय बरी नसतानाही राजेश टोपे त्यांची काळजी घेत महाराष्ट्राचीही काळजी घेताना दिसत होते. त्यानंतर काही दिवसांनी म्हणजेच १ ऑगस्ट २०२० ला त्यांच्या आईचं दु:खद निधन झालं. त्यांच्या निधनानंतर राजेश टोपे यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. मात्र, राज्यात कोरोनामुळे भीषण परिस्थिती असल्यामुळे राजेश टोपे यांनी संयमीपणे या दु:खाला पाठीमागे सारत कोरोनाविरोधाच्या लढाईत फ्रंट लाईनवर काम सुरु केलं होतं. आपल्या आईनेच कर्म करण्याची शिकवण दिली, अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती.

“आईच्या मृत्यूनंतर तीन दिवसाच्याआत संपूर्ण अंत्यविधीचे सोपस्कार करुन कामाला लागलोय. माझे प्रेरणास्थान शरद पवार आहेत. ते सातत्याने काम करत आहेत. वयाच्या ८० व्या वर्षी ते लोकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. ते संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहेत. लोकांना प्रोत्साहन देत आहेत. लोकांची भीती घालवत आहेत”, असं राजेश टोपे म्हणाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सगळ्यांना लस पोहोचवण्यासाठी केंद्राकडे ८० हजार कोटी आहेत का? अदार पुनावालांचा प्रश्न

News Desk

महाशक्ती असोसिएशन व एस एम एस ग्रुप तर्फे गरजूंना अन्नदान,मदत लॅाकडाऊन संपेपर्यंत सुरू राहणार !

News Desk

घरात नाही दाणा, पण मला ‘व्हॅक्सिन गुरू’ म्हणा, रुपाली चाकणकरांनी केंद्राला डिवचलं

News Desk