HW News Marathi
महाराष्ट्र

जावई या नात्याने डोबिंवलीकडे लक्ष द्या…

डोंबिवली | डोंबिवलीतील वाढते प्रदूषण, शहराची दुरावस्था या कारणासाठी महापालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी केली. दरम्यान, “कोणत्याही बाबतीत मला टीका करायची नाही, पण आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे डोंबिवलीचे जावई आहेत, आतातरी त्यांनी डोंबिवलीकडे लक्ष द्यावे”, असा जोरदार टोला त्यांनी मुख्यमंत्र्याना मारला आहे.

“डोंबिवलीच्या प्रदुषणाला आणि अस्वच्छतेला जबाबदार असणाऱ्या एमआयडीसी, महापालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करावी”, अशा मागणीचं पत्रही राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं. तसेच, “केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनीही काही वर्षांपूर्वी डोंबिवलीला बकाल शहर असे संबोधून देखील इथल्या महापालिका अधिकाऱ्यांनी त्या नाराजीच्या वक्तव्यातून कसलाच बोध घेतला नाही, अशी शोकांतिका नागरिकांची आहे आणि आपली जबाबदारी एकमेकांवर ढकलून हात वर करतायत. त्यामुळेच इतर संस्थांना पुढे येऊन नालेसफाई करावी लागते”, असं म्हणत राजू पाटील यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, “डोंबिवली शहराचा बट्ट्याबोळ झाला आहे. येथे प्रचंड प्रदूषण आहे. त्यावर तुम्ही तरी लक्ष द्या. जर आम्ही गेलो, तर आमच्यावर कलम ३५३ अंतर्गत तक्रारी होतात. याबाबत आंदोलन किती वेळा करणार त्यालाही मर्यादा असते. पण मुख्यमंत्री डोंबिवलीचे जावई आहेत, डोंबिवली शहरावर आता त्यांनी लक्ष द्यावे आणि डोंबिवली शहर सुधारावे. कारखानदारांना महानगर गॅस परडवत नसेल तर राज्य शासनाने धोरणात्मक निर्णय घ्यावा व त्यांना सवलत (सबसीडी) द्यावी आणि तातडीने प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत”, अशीही मागणी आमदार पाटील यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना पाठवलेल्या दुसऱ्या पत्राद्वारे केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“महाराष्ट्र तुफां के साथ हमेशा खेला है”, चाकणकरांचे अमृता फडणवीसांना प्रत्युत्तर

News Desk

मुंबई बँक निवडणुकीत प्रविण दरेकर यांचे वर्चस्व

Aprna

काँग्रेसच्या नगरपालिका आणि महानगरपालिकांना निधी कमी मिळाला, कॉंग्रेसची पुन्हा एकदा नाराजी

News Desk