HW News Marathi
महाराष्ट्र

संघटनेतून हाकललेल्यांना पुन्हा सोबत घेण्याचा प्रश्नच नाही, राजू शेट्टींची बोचरी टीका

मुंबई । “संघटनेतून हाकललेल्यांना पुन्हा सोबत घेण्याचा प्रश्नच येत नाही”, असे म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी थेट रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्यासोबत जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम लावला आहे. “मी ज्यांचे हात आणि चारित्र्य स्वच्छ आहे त्यांच्याबरोबर काम करतो. मात्र, त्यांच्याकडे हे दोन्हीही नाही. संघटनेतून हाकललेल्यांना पुन्हा सोबत घेण्याचा प्रश्नच येत नाही”, असे स्पष्ट विधान राजू शेट्टी यांनी केले आहे.

सदाभाऊ खोतांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला असेल म्हणूनच…!

राजू शेट्टी यावेळी सदाभाऊ खोत यांच्यावर निशाणा साधताना म्हणाले की, “सदाभाऊ खोत यांना हाकलण्याचं मूळ कारणचं असं होतं की ते स्वच्छ हात आणि स्वच्छ चारित्र्य या आमच्या निकषांमध्ये बसत नव्हते. शेतकऱ्यांबाबत पुतणा-मावशीचं प्रेम अनेक जण दाखवतात. पण त्यात गांभीर्य किती आहे हे बघावं लागेल. म्हणून मगरीचे अश्रू ढाळणाऱ्या खोतांबद्दल आम्हाला काहीही वाटण्याचं कारण नाही. त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला असेल म्हणूनच कदाचित ते आमच्याप्रती प्रेम भावना व्यक्त करीत आहेत. पण यांच्या अशा मायावी बोलण्याला कोणी फसणार नाही”, अशी अत्यंत बोचरी टीका यावेळी राजू शेट्टी यांनी केली आहे.

काय म्हणाले होते सदाभाऊ खोत ?

सदाभाऊ खोत यांनी खरंतर आज (१६ नोव्हेंबर) एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना राजू शेट्टी यांच्यासोबत जाण्याचे संकेत दिले होते. “राजकारणात कुणीही कुणाचा शत्रू नसतो. ” असे सदाभाऊ खोत म्हणाले होते. त्याचप्रमाणे, “राजू शेट्टी प्रस्थापितांच्या बाजूला गेले म्हणून फक्त आमच्यात दरी निर्माण झाली. जर शेट्टी प्रस्थापितांच्या नरड्यावर पाय देण्यास रस्त्यावर उतरले तर निश्चितपणाने राजू शेट्टींच्या खांद्याला खांदा लावेन”, असेही सदाभाऊ खोत म्हणाले होते. त्यावरच राजू शेट्टी यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मराठा आरक्षण | संघर्ष न करता सरकारला सहकार्य करण्याची संभाजीराजेंची भूमिका अमान्य!

News Desk

‘माळीण’ गाव फडणवीस सरकारच्या भ्रष्टाचाराचे पारदर्शक उदाहरणः सचिन सावंत

News Desk

पत्नी रुग्णालयात, मुलगा कोरोनाशी झगडतोय..ठाकरे महाराष्ट्र सांभाळतायत,उद्धव ठाकरे होणं अवघडं!

News Desk