HW News Marathi
महाराष्ट्र

हिंमत असेल तर वीज कनेक्शन तोडून दाखवा,दोन हात करायला आम्ही तयार आहोत- राजू शेट्टी

सांगली | हिंमत असेल तर ऊर्जा मंत्र्यांनी घरगुती वीज कनेक्शन तोडून दाखवावे, दोन हात करायला आम्हीही तयार आहोत, असा गर्भित इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. वीज कंपनीकडून वीज ग्राहकांना तातडीने वीज बिल भरा अन्यथा वीज कनेक्शन खंडित करण्यात येतील असा इशारा दिला आहे. त्याच पार्श्वभूमीवर राजू शेट्टींनी त्याला प्रत्युत्तर देत, लॉकडाउनमधील वीज बिल माफ करण्याची मागणी करत वीज कनेक्शन तोडू देणार नाही,अशी भूमिका जाहीर केली आहे. त्याबरोबर मंत्र्यांनी सुद्धा राज्यात दौरा करून सर्वसामान्यांची वीज बिलाबाबत असणारी परिस्थिती जाणून घ्यावी,असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले आहे.

कोरोनाच्या लॉकडाऊन काळात अनेकांना भरमसाठी वीजबिले आली आहेत. याबाबत ग्राहकांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात होती. वीजबिले माफ करण्याची मागणी अनेक राजकीय पक्षांनी केली होती. दरम्यान, आता तातडीने वीज बिल थकबाकी वसुली करण्याबाबत महावितरणाने आदेश जारी केले आहेत. जर तुम्ही वीजबिल भरले नाही तर थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत होणार आहे.वीजबिल थकबाकीची वसुली तातडीनं करण्याचे आदेश महावितरणने आपल्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत. सोबतच थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा त्वरित खंडित करण्याचे आदेशही दिले गेले आहेत.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काहीच कल्पना न देता राजभवनात बोलविले !

News Desk

राज्य सरकारसह अनिल देशमुखांना हायकोर्टाने दिला दणका; आव्हान याचिका फेटाळली

News Desk

राज्यपालांनी ‘या’ करणासाठी मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र

News Desk