HW News Marathi
महाराष्ट्र

कृषी कायद्याबाबत मोदी सरकार कोर्टाचीही दिशाभूल करेल, राजू शेट्टींचा आरोप

कराड | सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारला दणका देत कृषी कायद्यांना अंतरिम स्थगिती दिली आहे. यावरुन राजकीय वर्तृळात चर्चा सुरु झाल्या आहेत. यावरुन अनेकांनी निर्णयाचे स्वागत केले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी भाष्य केले आहे. सुप्रीम कोर्टाने कृषी कायद्यांसाठी एक समिती गठीत केली आहे. या समितीत कृषी कायद्यांना समर्थन करणाऱ्यांनाच नेमले आहे, त्यामुळे शेतकरी वर्गात असंतोष पसरला आहे.

या पार्श्वभूमीवर अदानी, अंबानीला अजून काही या कृषी कायद्यात दुरुस्ती करुन घ्यायची आहे ती घ्या आणि कायमचेच शेतकऱ्यांच्या बोकांडी हे कायदे बसवून देऊयात असे कोर्टाला म्हणायचे आहे का अशी शंका राजू शेट्टींनी व्यक्त केली आहे, कराड येथे पत्रकारांशी ते संवाद साधत होते.

सुप्रीम कोर्टाने कृषी कायद्याला स्थगिती दिल्यामुळे आम्ही जी मागणी करत होतो ती योग्य होती यावर शिक्कामोर्तब झाले आहे. आमची भूमिका कोर्टाने मान्य केली आहे. मात्र, मोदी सरकार सुप्रीम कोर्टाची दिशाभुल करुन आम्हाला मुर्ख बनवायचा प्रयत्न करत आहे का अशी भीती वाटत आहे, असेही राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. त्यामुळे मोदी सरकार आता पुढचे पाऊल काय उचलणार हे पाहण महत्वाचे असणार आङे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनिल देशमुखांना मोठा धक्का, दोन महत्त्वाच्या जागांवर भाजप चा ताबा

News Desk

ईएसबीच्या नियुक्त्या करणार कायम, मराठा आरक्षणासंदर्भात सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय!

News Desk

“राज्यात बिगबॉसचा शो सुरू आहे की काय”, पंकजा मुंडेंचं मिश्किल वक्तव्य

News Desk