HW News Marathi
महाराष्ट्र

कंगनासारख्या नटवीनं शेतकऱ्याला ‘दहशतवादी’ म्हणणं हाच मोठा विनोद!

मुंबई । बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने शेतकऱ्यांचा ‘दहशतवादी’ असा उल्लेख केल्यानंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सडकून टीका केली आहे. “कंगनासारख्या नटवीनं शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणणं यापेक्षा दुसरा विनोद नाही. शेतकऱ्यांवर टीका करणाऱ्या या नट-नटींना शेतकऱ्यांची पोरं सडेतोड उत्तरं देतील”, असे राजू शेट्टी म्हणाले. मोदी सरकारच्या वादग्रस्त अशा कृषी विधेयकाविरोधातही राजू शेट्टींनी केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

कंगनावर टीका करताना राजू शेट्टी म्हणतात की, “शेती आणि शेतकऱ्यांशी संबंधित प्रश्नांवर हिमाचल प्रदेश सारख्या एका उंच टेकडावर जन्मलेल्या नटीने बोलणं यापेक्षा मोठा विनोद नाही. कंगनाला पुढे करणाऱ्यांना शिखंडे म्हणावं की आणखी काय म्हणावं यासाठी मला शब्दही सुचत नाही. शेतकरी त्यांच्या न्याय हक्कासाठी लढत असताना या नट-नट्या जर त्यांचा अशा पद्धतीने अपमान करत असतील तर तुमच्याकडे पाशवी बहुमत असलं तरी याच शेतकऱ्यांची पोरं हातात दगडं घेऊन रस्त्यावर उतरतील. त्या दगडांपुढे तुमच्या काचा टिकणार नाहीत. तुमचे काचेचे मनोरे क्षणात उद्ध्वस्त होतील. आता तो दिवस फार लांब नाही”, असा इशाराच राजू शेट्टींनी दिला आहे.

राजू शेट्टी पुढे म्हणतात, “पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश किंवा तेलंगणा या ठिकाणचा शेतकरी त्याच्या न्याय हक्कासाठी मोठ्या ताकदीने रस्त्यावर उतरला आहे. सरकारने मान्य केलेला हमीभाव मिळणं हा शेतकऱ्याचा संविधानिक हक्क आहे. मात्र, आता केंद्र सरकारने नव्याने आणलेल्या कृषी विधेयकांमुळे शेतकऱ्यांच्या त्या हक्कावर घाला घातला जात आहे. त्यांच्या आशा आकांक्षांचा धुळीस मिळाल्या आहेत. या बिकट स्थितीत शेतकरी आपला समस्या मांडण्यासाठी आक्रोश घेऊन रस्त्यावर उतरत असताना कंगना राणावतसारख्या एका नटवीनं शेतकऱ्याला दहशतवादी म्हणणं याच्यासारखी दुसरी विनोदाची गोष्ट नाही.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गृहविलगीकरणातही उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कार्यालयीन कामकाज सुरु, व्हीसीद्वारे बैठकांना उपलब्ध

News Desk

मराठा समाजाचा मुंबईत एल्गार !

News Desk

“एखाद्या पदासाठी कुणासमोर हात पसरविण्याचं संस्कार आमच्या रक्तात नाही!” – पंकजा मुंडे

News Desk