HW News Marathi
महाराष्ट्र

पावसाळी अधिवेशनातच विधानसभा अध्यक्षाची निवड होणार – बाळासाहेब थोरात

मुंबई | राज्याचे पावसाळी अधिवेशन कोरोनाच्या पार्श्वभूमिवर २ दिवसांचं असणार आहे. यावरुन एकीकडे भाजपने राज्य सरकारला घेरलं असताना दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष कोण होणार? त्या पदासाठी निवड कोणाची होणार का? हा मुद्दाही चर्चेत आहे. यावर कॉंग्रेसचे नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज (३० जून) पत्रकारांशी बातचीत करताना महत्वाची माहिती दिली आहे. विधानसभा अध्यक्ष पदाची निवड ६ जूलैला होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. ५ आणि ६ जूलैला राज्याचं पावसाळी अधिवेशन पार पडणार आहे. त्यामुळे आता कोण या अध्यक्षपदी विराजमान होणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. आधी नाना पटोले हे विधानसभा अध्यक्ष होते. त्यानंतर त्यांनी या पदाचा राजीनामा देत महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले. तेव्हापासून ही जागा रिकामी आहे. आता यावर कोणाची वर्णी लागणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

“विधानसभा अध्यक्ष कोण होईल याचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील”, शिवसेना मंत्र्याचं विधान

काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींमुळे महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाला आहे, एकीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी नेत्यांच्या नावांची रांग सुरू झाली असताना विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंनी राजीनामा दिला. अशात शिवसेना मंत्री उदय सामंत यांनी राज्यात मंत्री कोण होईल, विधानसभा अध्यक्ष कोण होणार हे मुख्यमंत्री ठरवतील, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा शब्द आमच्यासाठी अंतिम आहे असं विधान करून काँग्रेस-राष्ट्रवादीला अप्रत्यक्षपणे इशारा दिला होता.

भाजप नेत्यांचं राज्यपालांनी ऐकलं ,अधिवेशनासंदर्भात थेट मुख्यमंत्र्याना लिहीलं पत्र !

कोरोना संकटाची सध्याची स्थिती पाहता आणि तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन मुंबई येथे होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी ५ व ६ जुलै या दोन दिवसाचे कामकाज निश्चित करण्यात आले आहे. यावरुन राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने टीका केली होती. २ दिवसांच्याच अधिवेशनाच्या कालावधीवरुन त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली होती. तसेच, भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत त्यांना पत्र दिलं होतं. ज्यात अधिवेशनाचा कालावधी वाढवावा याची मागणी केली होती. यानंतर आता थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी पावसाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवावा यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री काय निर्णय घेणार? अधिवेशनाचा कालावधी वाढवणार का हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

राज्यपालांच्या ३ मागण्या कोणत्या?

१- विधानमंडळाचे अधिवेशन अधिक कालावधीसाठी घेणे

२- विधानसभा अध्यक्ष्यांचे संविधानिक पद तातडीने भरण्याची कार्यवाही करण्याबाबत आणि

३- राज्यातील ओबीसी आरक्षणाचा विषय प्रलंबित असल्यामुळे, स्थिनिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सद्यस्थितीत न घेण्याबाबत

विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानभवनाच्या प्रांगणात पावसाळी अधिवेशनाची बैठक झाली होती. या बैठकीला विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, संसदीय कार्यमंत्री ॲड.अनिल परब, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे, मंत्रीमंडळातील सदस्य, विधानपरिषद आणि विधानसभा कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, संसदीय कार्य विभागाचे सचिव राजेंद्र भागवत आदी उपस्थित होते.

कोरोना चाचणी होणार

बैठकीत पावसाळी अधिवेशनामध्ये विधानसभा आणि विधानपरिषदेच्या कामकाजासंदर्भातील तात्पुरत्या दिनदर्शिकेवर चर्चा करण्यात आली.कोरोना विषाणूचा संसर्ग होवू नये म्हणून विधानभवनात अधिवेशन कालावधीमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व मान्यवरांना, अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी यांच्याकरिता लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेले असले तरी अधिवेशन कालावधीत विधानभवन परिसर प्रवेशाकरिता सर्वांना RT-PCR कोरोना चाचणी सक्तीची करण्यात आली आहे.यासाठी विधानभवन, मुंबई येथे शनिवार व रविवारी दि. 3 व 4 जुलै, 2021 रोजी RT-PCR कोरोना चाचणीसंदर्भात व्यवस्था करण्यात येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना घरगुती दराने वीज पुरवठा करणार’

News Desk

जळगावात गिरीश महाजनांचा शिवसेनेला धक्का; 13 नगरसेवकांची घरवापसी

News Desk

भाजप कोणतंही राजकारण करत नाही, तुम्हीच राजकारण थांबवा, राबसाहेब दानवेंचा राऊतांवर पलटवार

News Desk