HW News Marathi
महाराष्ट्र

राजू शेट्टी यांनी घेतली नारायण राणे यांची भेट, मोर्चेबांधणीला सुरुवात

मुंबई | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांची भेट घेतली आहे. या दोघांच्या भेटींनी राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. राजू शेट्टी आणि राणे यांच्या भेटीत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे.

या दोघांमध्ये ईव्हीएम संदर्भात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. येत्या विधानसभा निवडणुका ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर घ्याव्यात याबाबतही चर्चा झाल्याची माहिती आहे. यापूर्वी राजू शेट्टी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची दोन वेळा भेट घेतली आहे. येत्या निवडणुकीत आघाडी आणि युती व्यतिरिक्त स्वाभिमानी शेतकरी संघटना, महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष आणि मनसे यांचाही पर्याय मतदारांना उपलब्ध होऊ शकतो.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विजयाबद्दल विश्वास नाही म्हणुन पंकजांची निवडणूकीतून माघार ,धनंजय मुंडेंचा टोला!

News Desk

राष्ट्रीय पंचायत पुरस्कार जाहीर; उत्कृष्ट जिल्हा परिषद पुरस्कारात कोल्हापूर अव्वल

Aprna

राज्यात उद्याच होणार बहुमत चाचणी, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

News Desk