HW News Marathi
महाराष्ट्र

काही तास बाकी वादळापूर्वीची शांतता !

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि राज्यासभेचे खासदार नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. परंतु, राणेंचा प्रत्यक्ष भाजपमध्ये प्रवेश झालेला नाही. मात्र, महात्मा गांधी जयंती निमित्ताने आज (२ ऑक्टोबर) नारायण राणेचे चिरंजीव नितेश राणे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

यापूर्वी नितेश राणेंनी “काही तास बाकी वादळापूर्वीची शांतता,” अशा फेसबुक आणि ट्वीटरवर पोस्ट शेअर केले आहे. राणेंच्या या पोस्टमुळे राज्याच्या राजकारणात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. तसेच कणकवली मतदारसंघ हा राणे यांचा बालेकिल्ल्या मानला जातो. नितेश राणे यांनी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून नितेश राणे यांनाकणकवली देवगडमधून नितेश राणे हे भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखळ करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

नितेश राणेंचा अल्पपरिचय

नितेश राणे यांनी २००९ साली राजकारणात पाऊल ठेऊन पहिल्यांदाच कणकवली विधानसभा मतदारसंघात २५ हजारांपेक्षा जास्त मताधिक्क्याने काँग्रेसकडून निवडून आले होते. तर २०१४ साली भाजपच्या प्रमोद जठार यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कणकवली कासार्डेत भव्य सभा घेऊन ही भाजपचा उमेदवार निवडून आला नाही. २०१४ साली काँग्रेसकडून निवडणूक लढवत असताना नितेश राणे यांनी ७४ हजार ७१५ मत घेऊन निवडून आले होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘माझा दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकारींनी मला भेटणे अपेक्षित होते’, – भारती पवार

News Desk

ठाकरे सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि अनेक सुपर मुख्यमंत्री, फडणवीसांचा लॉक-अनलॉकच्या गोंधळावरुन टोला

News Desk

“राज्यातील शेतकऱ्यांकडे लक्ष द्या”, खासदार रक्षा खडसेंचं मुख्यमंत्र्यांऐवजी शरद पवारांना पत्र

News Desk