HW News Marathi
महाराष्ट्र

होळी घराच्या दारात पेटवायची नाही, मग काय घरात पेटवायची? भाजपचा सरकारला सवाल

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होळी आणि धुलिवंदनाच्या सणावर ठाकरे सरकारकडून लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. ठाकरे सरकार फक्त हिंदू सणांनाच आडकाठी का करते, असा सवाल भाजप आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी उपस्थित केला. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करुन होळीचा सण साजरा करण्यात काय गैर आहे? इतर धर्माच्या लोकांच्या सणांना परवानगी दिली जाते. ते लोक कोरोनाचे नातेवाईक आहेत का, याचे उत्तर वसुली सरकारने द्यावे, अशी टीका राम कदम यांनी केली आहे.

राम कदम यांनी ट्विट करत राज्य सरकारवर चांगलीच आगपाखड केली. धुलिवंदनाच्यावेळी गर्दी होते, एकमेकांना रंग लावताना स्पर्श होतो. त्यामुळे धुलिवंदनावर घालण्यात आलेले निर्बंध मी समजू शकतो. पण होळी सार्वजनिक ठिकाणी म्हणजे घराबाहेर पेटवू शकत नाही, असे ठाकरे सरकार म्हणते. मग आम्ही घरामध्ये होळी पेटवायची का? ठाकरे सरकारची अक्कल कुठे गेली आहे, असा सवालही राम कदम यांनी विचारला आहे.

 

काय आहेत नियम?

होळी, धुळवडीला सण सार्वजनिकरीत्या साजरा करण्यास मनाई करण्यात आली आहे. पालिकेने दोनच दिवसांपूर्वी तसे आदेश जाहीर केले आहेत. निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक विभागात पाच पथके तयार क ली आहेत. ही पथके फिरतीवर राहतील व तपासणी करतील. एखाद्या ठिकाणी नियमभंग होतो आहे असे आढळले तर समज दिली जाईल. मात्र त्यानंतरही लोकांनी ऐकले नाही तर पोलिसांची मदत घेतली जाईल व कारवाई केली जाणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी घेतलेला निर्णय केला रद्द …

News Desk

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण

News Desk

आपल घरं का सोडायचं ? पंकजांच्या भाजप सोडण्याच्या चर्चांना पुर्णविराम !

News Desk