HW News Marathi
महाराष्ट्र

“वर्षभर ३ पक्ष एकत्र विटी दांडू खेळत होते का”, भाजपचा परखड सवाल

मुंबई | महाराष्ट्रात वर्षभरापूर्वी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर वर्षभरात या आघाडी सरकारला कोरोनासाठीच्या उपाययोजना निर्माण करायला वेळ मिळाला नाही. लोकांचे तडफडून मृत्यू होत आहेत. स्मशानभूमीत २४ तास मृतदेह जळत आहेत. वर्षभर तीन पक्ष एकत्र मिळून काय विटी दांडू खेळत होते? असा प्रश्न भाजप नेते राम कदम यांनी उपस्थित केला आहे.

काय म्हणाले राम कदम?

एक वर्ष झाल्यानंतरही वसूली सरकारला बेड, औषधी आणि ऑक्सिजनची व्यवस्था करता आली नाही. सध्या रुग्णांना बेड मिळत नाही, ऑक्सिजन नसल्यामुळे लोकांचा मृत्यू होत आहेत, मग सरकारने गेल्या वर्षभरात काय केले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कुंभकर्ण सारख्या झोपेत सरकार होते का? लॉकडाऊन लावल्यामुळे लोकांवर उपासमारीची वेळ आलीय. याला जबाबदार ठाकरे सरकार असल्याचेही ते म्हणाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सातारा जिल्ह्यातील लम्पी प्रादुर्भावाचा मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला आढावा

Aprna

‘आयत्या बिळावर नागोबा’सारखे जाऊन बसलेल्या चंद्रकांत पाटलांनी शरद पवारसाहेबांची मापं काढणे बंद करावे – जयंत पाटील

News Desk

अर्णब गोस्वामीवरील कारवाई म्हणजे अन्वय नाईक यांना मविआ सरकारकडून न्याय आणि श्रदधांजली: सचिन सावंत

News Desk