HW News Marathi
महाराष्ट्र

माझी सुरक्षा कमी केली तरी माझ्या कामात काही फरक पडणार नाही – रामदास आठवले

मुंबई | माझ्या शरीरात प्राण असेपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या रिपब्लिकन पक्षाचे नाव जिवंत ठेवणार आहे. रिपब्लिकन पक्षाच्या नावाला डाग लागू देणार नाही. अशी शपथ रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी घेतली आहे.

आठवले म्हणाले की, “राज्यातील नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत बदल करताना केवळ विरोधी पक्षांच्या नेत्यांचीच सुरक्षा व्यवस्था काढून घेण्याची,कपात करण्याची राज्य सरकारची भूमिका दुजाभाव करणारी आणि अन्यायकारक आहे. माझी सुरक्षा कमी केली तरी माझ्या कामात काही फरक पडणार नाही आणि माझे काम कुठेही थांबणार नाही.”

तसंच, मुंबई रिपब्लिकन पक्षाच्या ताकदीने झोपड्यांना अभय देण्याचे काम आम्ही केले. झोपड्यांच्या जागी आता एसआरए मुळे इमारती उभ्या राहिल्या आहेत. एसआरए योजनेत ५५० फूट बिल्ट अप एरिया चे घर द्यावे ही रिपाइं ची मागणी असल्याचंही आठवले यांनी सांगितलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धव ठाकरेचं ५ वर्ष मुख्यमंत्री असतील! नाना पटोलेंचं ‘त्या’ वक्तव्यावर स्पष्टीकरण

News Desk

#Vidhansabha2019 : पुण्याच्या ८ ही जागा भाजपकडे

News Desk

राज्यातील एकपडदा थिएटरचालकांचे खासदार सुप्रिया सुळेंना पत्र, पुन्हा थिएटर सुरु करण्याची केली मागणी

News Desk