HW News Marathi
क्राइम

शाहरुखचा मुलगा असो किंवा इतर कोणीही, कठोर शिक्षा झालीच पाहिजे – रामदास आठवले

मुंबई | मुंबईत रविवारचा दिवस गाजला तो अमलीपदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईमुळे. शनिवारी रात्री मुंबईहून गोव्याला जात असलेल्या एका क्रूझवर NCB ने धाड टाकून अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केला आहे

NCB ने ७-८ जणांना ताब्यात घेतलं

या कारवाईत NCB ने ७-८ जणांना ताब्यात घेतलं असून यात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचाही समावेश आहे. NCB च्या या कारवाईनंतर आता राजकीय क्षेत्रातूनही यावर प्रतिक्रीया येण्यास सुरुवात झालेली आहे. केंद्रीय मंत्री आणि RPI चे अध्यक्ष रामदास आठवले यांनी, शाहरुखचा मुलगा असो किंवा इतर कोणीही या प्रकरणात सहभागींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे असं वक्तव्य केलंय.

दरम्यान NCB अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री करण्यात आलेल्या कारवाईत जहाजावर कोकेन, चरस आणि एमडीएमए यासह विविध अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आल्यामुळे दिवसभर प्रसारमाध्यमांमध्ये याची चर्चा सुरु आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

ट्रक व मॅजिक धडकेत २ ठार ४ जण गंभीर जखमी 

News Desk

लष्कराच्या रेल्वेगाडीतून अश्रुधूराच्या नळकांड्या चोरीला!

News Desk

प्रमोशन मिळाले नाही मॅनेजरची आत्महत्या

News Desk