HW News Marathi
महाराष्ट्र

केंद्रीय गृहमंत्री आणि राज्याच्या गृहमंत्र्यांना कश्यप प्रकरणात लक्ष देण्यास सांगेल, आठवलेंचा पायल घोषला शब्द

मुंबई | अभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर अत्याचार केल्याचे आरोप केले होते. यासंदर्भात पायल घोषने मुंबई पोलिसात तक्रार देखील दाखल केली होती. मात्र, अनुरागवर अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याने केंद्रीय मंत्री आणि रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी आज (२८ सप्टेंबर) पायल घोषची भेट घेतली. या भेटीनंतर या दोघांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली असून, या परिषदेमध्ये रामदास आठवलेंनी पायल घोषची बाजू मांडताना मुंबई पोलिसांच्या तपासाच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

तसेच, पायल घोष प्रकरणात आता मी स्वत: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहून, या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती करणार असल्याचे, या पत्रकार परिषदेत बोलताना रामदास आठवले यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेत बोलताना रामदास आठवले म्हणाले, ‘अभिनेत्री पायल घोषसोबत मी अर्धातास चर्चा केली. काहीवर्षांपूर्वी पायलवर अनुराग कश्यप यांनी अत्याचार केला आहे. या प्रकरणी मी, विश्वास नांगरे पाटील, अभिषेक त्रिमुखे यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे सांगितले आहे. आमचा पोलिसांच्या चौकशीवर विश्वास आहे, मात्र एवढा उशीर लागत असताना कसा विश्वास ठेवायचा असा प्रश्न आहे.’

अनुराग कश्यप मुंबईतच आहेत. तरीही त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलेले नाही. पायलला आपल्या जिवाची भिती आहे. तिने पोलिस संरक्षण मागितले आहे. याबाबत मी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी बोलणार आहे. मात्र, पायलचे काही बरे वाईट झाले तर त्याची जबाबदारी मुंबई पोलिसांची असेल. आम्ही तपासासाठी आठ दिवसांचा वेळ देतोय. जर योग्य दिशेने कारवाई झाली नाही, तर आम्ही आंदोलन करु. एक-दोन दिवसात आमचे एक डेप्युटेशन अनिल देशमुख यांनाही भेटणार आहे,’ असेही रामदास आठवले यांनी यावेळी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

वाझेंना वकिलाची गरज नाही, उद्धव ठाकरे आहेत ! फडणवीसांचा बोचरा टोला

News Desk

काँग्रेस सोडून जाणारे NSUI ,Youth congress अशा पक्षाच्या संघटनात्मक बांधणीतून तयार झाले नाहीत – सत्यजित तांबे

News Desk

मुंबईत महानगरपालिकेवर गेल्या २५ वर्षापासून शिवसेनेचा परफेक्ट कार्यक्रम सुरुच, राऊतांचा भाजपला टोला

News Desk