HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबईत महानगरपालिकेवर गेल्या २५ वर्षापासून शिवसेनेचा परफेक्ट कार्यक्रम सुरुच, राऊतांचा भाजपला टोला

मुंबई | राज्यात सध्या निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. नुकतंच सांगली, जळगावमध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपचा करेक्ट कार्यक्रम करण्यात आला. राष्ट्रवादी, शिवसेनेने भाजपला चांगलीच धुळ चारल्याचं या निवडणुकीत दिसून आलं. आता मुंबई महानगरपालिकेच्या निवणुका तोंडासमोर असताना भाजपने शिवसेनेला आव्हान दिलं आहे की यावेळी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप डंका वाजवणार आहे. मात्र, मुंबई महापालिका शिवसेनेची मक्तेदारी आहे, गेली २५ वर्ष शिवसेनेचीच पालिकेत सत्ता आहे. त्यामुळे पालिकेत आमचा करेक्ट कार्यक्रम भाजपला करता येणारच नाही असं ठामपणे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे. आज (२० मार्च) प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.

“मुंबई महानगरपालिकेत २५-३० वर्षांपासून परफेक्ट कार्यक्रम सुरुच आहे आणि तो बदलणार नाही. मुंबई महानगपालिकेवर कुणी कितीही प्रयत्न केले तरी आमचा कार्यक्रम होणार नाही, जो आहे तोच कार्यक्रम पुढे सुरु राहणार. भगवा फडकला आहे तो फडकत राहणार, असा ठाम विश्वास राऊत यांनी व्यक्त करत भाजपला थेट उत्तर दिलं आहे. आज सामनाच्या अग्रलेखातून सांगली, जळगावात भाजपचा राष्ट्रवादी, शिवसेनेने केलेल्या करेक्ट कार्यक्रमाबद्दल लिहिले असून ही तर नांदी आहे पुढे असे कार्यक्रम सुरुच राहणार”, असल्याचंही म्हटलं आहे.

काय लिहिले आहे अग्रलेखात?

सांगली-जळगावातील करेक्ट कार्यक्रम ही तर नांदी आहे. यापुढे असे अनेक कार्यक्रम होतील अशा इशाराच शिवसेनेने दिला आहे. “सांगलीत जळगावात सत्ताबदल झाला. त्याला फार मोठे नैतिक अधिष्ठान नसले तरी नैतिक किंवा अनैतिक यावर बोलण्याचा अधिकार भाजपाने गमावला आहे,” असंही शिवसेनेने सामना संपादकीयमधून म्हटलं आहे. “सांगली महापालिकेत जयंत पाटील यांनी भारतीय जनता पक्षाचा करेक्ट कार्यक्रम केला. तेथील पालिकेतील भाजपची सत्ता उलथवून राष्ट्रवादीचा महापौर केला. हा कार्यक्रम करेक्ट व्हावा यासाठी भाजपाच्या १७ नगरसेवकांनी वाऱ्याची दिशा पाहून मतदान केले. आता त्यापेक्षा करेक्ट कार्यक्रम जळगाव महानगरपालिकेतही झाला असून भाजपच्या २७ नगरसेवकांनी वाऱ्याची दिशा ओळखून शिवसेनेचा महापौर व्हावा यासाठी मतदान केले. अशातऱ्हेने सांगलीपाठोपाठ जळगावात भाजपचा गड पडला आहे. जळगावात महापौर आणि उपमहापौर शिवसेनेचाच झाला. त्यामुळे उत्तर महाराष्ट्राचे स्वयंभू बादशहा गिरीश महाजन यांना जोरदार धक्का बसला आहे,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“पश्चिम बंगालमध्ये जी स्थिती होती, तशीच परिस्थिती ठाकरे सरकारला महाराष्ट्रात घडवायचीय” नितेश राणेंचा आरोप!

News Desk

राज्यातील विशेषत: असंघटीत क्षेत्रातील कारागीर, कुशल कामगारांना होणार लाभ ! | नवाब मलिक

News Desk

राज्यात लवकरच दुधाच्या प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी

News Desk