HW News Marathi
महाराष्ट्र

‘शिवसेनेच्या नेत्यांवर कुठे गुन्हे दाखल केले?’ रामदास आठवलेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

नागपूर | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात वक्तव्य केल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आज(२४ ऑगस्ट) पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, राणेंच्या अटकेच्या कारवाईवरुन भाजप नेते आणि मित्रपक्षाचे नेतेही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. नारायण राणे यांची जी भाषा आहे ती शिवसेनेचीच भाषा आहे. त्यामुळे त्यांना उत्तर देताना शिवसेनेच्या भाषेतूनच उत्तर द्यायचं होतं. पण तसं न करता चुकीच्या पद्धतीनं कारवाई केल्याचा आरोप केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केला आहे.

शिवसेना नेत्यांनी आणि शिवसैनिकांनी असं व्यक्तव्य केलं

रामदास आठवले यांनी शिवसेनेवर टीका केली असून त्यांच्यावर निशाणा साधला आहे. यापूर्वी अनेक शिवसेना नेत्यांनी आणि शिवसैनिकांनी असं व्यक्तव्य केलं आहे. त्यांच्यावर कुठे गुन्हे दाखल झाले, पोलिसांनी पकडलं दाखवा, असं आव्हानच रामदास आठवले यांनी महाविकास आघाडी सरकारला दिलंय. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना भाषणातून उत्तर द्यायला हवं होतं. पण पोलिसांकडून कारवाई करुन घेतली ती चुकीची आहे. पोलिसांची यात चूक नाही. पोलिसांच्या माध्यमातून सरकारकडून ही कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई चुकीची आहे, त्यांनी काही गुन्हा केलेला नाही, अशा शब्दात रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

तालिबानींपेक्षा ही भयंकर तालिबानी हे लोकं

आशिष शेलार पुढे म्हणाले,“ज्याप्रमाणे ही कारवाई झाली आणि मंत्री अनिल परब यांची एक क्लिप बाहेर आली त्यामुळे आता तालिबानींपेक्षा ही भयंकर तालिबानी हे लोकं आता जमलेले दिसत आहेत. नारायण राणेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. कोणाच्या म्हणण्यावरुन गुन्हे दाखल होणार असतील तर आता तुम्ही क्लिप दाखवताय तर आमच्याकडे सीडी आहे हे लक्षात ठेवा,” असे आशिष शेलार म्हणाले आहेत.

नारायणराव राणे यांच्यावरील कारवाई ही सूडबुद्धीने

देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री श्री नारायणराव राणे यांच्यावरील कारवाई ही सूडबुद्धीने केलेली आहे. पोलीस यंत्रणेचा दुरूपयोग करीत होत असलेल्या या दडपशाहीचा मी तीव्र निषेध करतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. शर्जिल उस्मानी मोकाट आणि नारायण राणे यांना अटक! हे आहे नवे हिंदूत्त्व आणि असा आहे नवा महाराष्ट्र !!!, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

शिवसेनेने हा तमाशा बंद करावा

भाजपच्या कार्यालयाजवळ जे तमाशे चालू झाले तर भाजप महाराष्ट्रभर तांडव करेल, त्याची सर्व जबाबदारी मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीची राहील. त्यानंतर मंत्री अनिल परब यांची क्लिपही व्हायरल झाली आहे. तालिबानींपेक्षाही भयंकर असं हे दिसतंय. मुळात राणे साहेबांनी स्वत: सांगितलं गुन्हा केला नाही, त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. तुम्ही क्लिप दाखवताय, आमच्याकडे सीडी आहेत. सगळ्या सीडी मविआ नेत्यांच्या आहेत. एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसलेत ना, ते एकमेकांवर गुन्हे दाखल करतील.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“ST च विलीनीकरण होणे शक्य नाही, आणि ही बाब विरोधी पक्षालाही माहीती”- शिवसेना

News Desk

‘फडणवीस सरकार चालू देतील तोपर्यंत हे सरकार चालणार’ मोठ्या नेत्याने केलं विधान !

News Desk

किरण गोसावीला पुणे पोलिसांकडून अटक

News Desk