HW News Marathi
महाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्र्याला अटक होण्याची पहिलीच वेळ!

संगमेश्वर। भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक झाल्यामुळे राज्यातील राजकारणाला मोठे वळण मिळाले आहे. उच्च न्यायालयाने सुनावणी घेण्यास नकार दिल्यामुळे राणे यांना पोलिसांनी अटक केली आहे. केंद्रात मंत्री झालेले नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा सुरू होती. मात्र, महाडमध्ये बोलत असताना राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात अपशब्द वापरला. त्यामुळे सकाळपासून ठिकठिकाणी शिवसैनिकांनी जोरदार आक्रमक होत भाजपची कार्यालय फोडून काढली. ठिकठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहे. सत्र न्यायालय आणि उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यामुळे अटक करण्यात आली.

राणे आपल्या दोन्ही मुलं आणि आमदार प्रसाद लाड यांच्यासोबत बंद खोलीत बसून होते

त्यामुळे गोळवली येथील रा.स्व. संघाच्या सेवा प्रकल्पाची पाहाणी करत असताना रत्नागिरी पोलिसांनी नारायण राणे यांना ताब्यात घेतले. राणे आपल्या दोन्ही मुलं आणि आमदार प्रसाद लाड यांच्यासोबत बंद खोलीत बसून होते. तर पोलिसांचा मोठा फौजफाटा बाहेर उभा होता. पोलीस अधिक्षकांनी राणेंना सोबत येण्याची विनंती केली, पण जेव्हा आतमध्ये मोठा गोंधळ उडाला. निलेश राणे यांनी पोलिसांना तुमच्याकडे अटक वॉरंट आहे का असं म्हणत हुज्जत घातली, त्यावेळी राणे जेवत असताना उठले. त्यानंतर राणेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्र्याला अटक होण्याची पहिली वेळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही दुसरी वेळ आहे, आणि त्यांच्या कारकिर्दीत अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात आजवर एकाही मंत्र्याला कुठल्या कारणावरून अटक झालेली नाही. मात्र नुकताच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, आणि महाराष्ट्रातून चार नेत्यांची वर्णी लागली त्यात पहिलं नाव होतं नारायण राणे यांचं, आणि नारायण राणे यांच्याकडे केंद्रीय सूक्ष्म लघुउद्योग मंत्रालयाचा पदभार देण्यात आला. मात्र महाराष्ट्रात महाविकास आघाडी सत्तेत आणि केंद्रात भाजप सत्तेत असल्यामुळे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी एकमेकांवर सुरू होत्या. त्यातूनच नारायण राणे यांची जीभ घसरली आणि शिवसैनिक आक्रमक झाले. याच मुद्द्यावरून आता इतक्या मोठ्या पदावर असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील केंद्रीय मंत्र्याला अटक करण्याची ही पहिलीच वेळ आहे. ही नामुष्की आता केंद्र सरकारवर ओढवली आहे. कोणतंही अटक वॉरंट नसताना केंद्रीय मंत्र्याला अटक करण्याचा प्रकार देशात पहिल्यांदाच घडलाय म्हणून आता भारतीय जनता पार्टी कडून निषेध करण्यात येतोय.

47 दिवसात नारायण राणे अटकेत

केंद्रीय मंत्रिमंडळाची शपथ घेताना महाराष्ट्रातून 43 मंत्र्यांच्या यादीत नारायण राणे यांचं नाव सर्वात वर होतं. त्यामुळे त्यांनी पहिली शपथ घेतली होती. राणे 6 वेळा आमदार राहिले आहेत. राणे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर सिंधुदुर्गात राणे समर्थकांनी जल्लोष केला होता मात्र आता केंद्रीय मंत्रिमंडळातील उच्च पदावर असलेल्या मंत्र्याला अटक झाल्याने आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळावर नामुष्की ओढवली आहे. फक्त 47 दिवस केंद्रीय लघु व सूक्ष्म उद्योग खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर लागलीच महाराष्ट्रातील आरोप-प्रत्यारोपांच्या कारणातून आता थेट केंद्रीय मंत्र्याला अटक करण्यात आली. नारायण राणे यांनी सात जुलैला केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली आणि अखेर सत्तेचाळीस दिवसानंतर नारायण राणे यांना अटक करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्री मंडळातील मंत्र्याला अटक होण्याची मात्र ही पहिलीच वेळ आहे.

काय आहे प्रकरण?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पातळी सोडून टीका केल्याचे प्रकरण आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भोवण्याची शक्यता आहे. कारण, नारायण राणे यांच्यावर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना अटक करण्यात येणार आहे. शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांनी नाशिक पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार केली होती. नाशिक पोलिसांच्या सायबर सेलने नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.

नारायण राणे काय म्हणाले होते?

नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सध्या कोकणात आहे. रायगडच्या महाडमध्ये पत्रकारांशी बोलताना राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष असल्याचं विसरले. त्यावेळी त्यांनी हीरक महोत्सव हा शब्द वापरला. मात्र, तिथे उपस्थित असलेले राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना अमृत महोत्सव असल्याचं सांगितलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपली चूक सुधारली. “आज 74 वर्षे पूर्ण करुन 75 व्या वर्षात अमृत महोत्सवी… नाही हीरक महोत्सवी… अमृत महोत्सवी वर्षात आपण पदार्पण करतो आहोत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावरुन राणे यांनी मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती, असा शब्दांत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रहार केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकऱ्यांनो धीर धरा, शासन तुमच्या पाठीशी! – डॉ. नितीन राऊत

Aprna

पुण्यातील फॅशन स्ट्रीटला भीषण आग, अथक परिश्रमाने आग आटोक्यात, ८०० दुकानं जळून खाक

News Desk

“मी कधीच माघार घेत नाही”, जितेंद्र आव्हाडांची ठाम भूमिका

Aprna