HW News Marathi
महाराष्ट्र

‘फडणवीस सरकार चालू देतील तोपर्यंत हे सरकार चालणार’ मोठ्या नेत्याने केलं विधान !

इंदापूर |  राज्यातील महाविकासआघाडीचे सरकार पाडण्याचा राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेला भाजप सातत्याने करत आहे. भाजप नेत्यांनी सरकार इतक्या दिवसात पडले तितक्या दिवसात पडेल अशी वक्तव्येही केली होती. असेच काहीसे महत्वाचे वक्तव्य केंद्रीय मंत्री आणि रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले आहे. जोपर्यंत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सरकार चालू देतील तोपर्यंत हे सरकार चालणार, असं केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलंय. ते इंदापूर इथे बोलत होते.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे आज (१० एप्रिल) पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी रवाना झाले आहेत. त्यादरम्यान पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी काही काळ थांबले होते. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांनी हे वक्तव्य केले. हे सरकार अजून किती दिवस टिकेल असा प्रश्न पत्रकारांनी रामदास आठवले यांना विचारला असता त्यावर रामदास आठवले म्हणाले की, “हे राज्य सरकार जोपर्यंत देवेंद्र फडणवीस चालू देतील तोपर्यंत चालेल” तसेच सचिन वाझे प्रकरणामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलिन झाली असून, महाराष्ट्राची बदनामी देशभर झाली आहे असं, रामदास आठवले म्हणाले आहेत.

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या विरुद्ध भाजपचे उमेदवार समाधान आवताडे असा थेट सामना होणार आहे. त्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीने जोरदार तयारी सुरु केली आहे. राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनामुळे ही पोटनिवडणूक लागली आहे. राष्ट्रवादीकडून भारत भालके यांचे पुत्र भरीरथ भालके यांनाच तिकीट देण्यात आलंय. तर परिचारक गटाने मंजुरी दिल्यानंतर भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली गेलीय. हे दोन्ही उमेदवार तगडे असल्यामुळे ही पोटनिवडणूक अतिशय चुरशीची ठरले अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रात अगदी योग्य वेळी आपली सत्ता आली !

swarit

महिलेवर सामूहिक बलात्कार , दोघाना अटक

News Desk

एकमेकांविरोधात कुरघोड्या करा मात्र जनतेला वेठीस धरू नका आशीष शेलारांची ठाकरे सरकारवर टीका

News Desk