HW News Marathi
महाराष्ट्र

राणेंच्या जनआशिर्वाद यात्रेमुळे मविआ सरकारला कोणताही धोका नाही”- विनायक राऊत

सावंतवाडी | दोनच दिवसापूर्वी राऊत यांनी आपल्या सोशल मिडियावरून राणे यांना शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीस्थळांचे दर्शन शिवसैनिक घेऊ देणार नाही. बाटग्याना प्रवेश नाही, अशी टिका केली होती. केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळांचे दर्शन घेतले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या पदराआडून घेतले आहे.

खासदार विनायक राऊत यांचे स्पष्टीकरण

त्यानंतर मात्र गुरूवारी राणे यांनी स्मृतीस्थळांचे दर्शन घेतले यावर राऊत यांनी खुलासा केला. त्यामुळे मी इशारा दिला म्हणजे, शिवसेनेत दोन मतप्रवाह असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. फडणवीस व दरेकर हे जाणार असल्यानेच शिवसैनिकानी विरोध केला नाही. ते गप्प राहिले, असा युक्तीवाद शिवसेना नेते खासदार विनायक राऊत यांनी केला.

राणे यांची जनआशिर्वाद यात्रे मुळे महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नाही. सरकार पाच वर्ष काय दहा वर्ष चालेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तसेच त्यांच्याकडे आता विकासांचे कोणते ही प्रश्न राहिले नाहीत, राणे जरी महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राची वाट लावली, असे म्हणत असले तरी केंद्राने काय चांगले केले ते तरी सांगावे महागाई तसेच डिझेल पेट्रोलचे दर वाढल्याने गरीब जनता त्यात होरपळून गेल्याचे राऊत म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“पंकजांनी भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या का?”; धनंजय मुंडे म्हणाले, “नाही, पण…”

News Desk

आर्वी तालुक्यातील अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणी दोषींवर कडक कारवाई व्हावी; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून निवेदन

Aprna

#MaharashtraElections2019 : राज्यात सकाळी ११ वाजपर्यंत १७.५० टक्के मतदान

News Desk