HW News Marathi
महाराष्ट्र

शेतकऱ्याची विटंबना मीच काय कोणीच करू शकत नाही, ‘त्या’ वक्तव्यावरुन दानवेंचा युटर्न

औरंगाबाद | शेतकरी आंदोलनावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंवर मोठ्या प्रमाणात टीका झालेली पाहायला मिळाली. यावर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. औरंगाबादमध्ये ते पत्रकार परिषदेत बोलत होते.केंद्रातला मंत्री असलो तरी गाईचं दुध काढतो, गाडी हाकतो आणि बैलही धुतो याचा अर्थ मी बनावट शेतकरी नाही तर हाडाचा शेतकरी असल्याचं दानवेंनी म्हटलं आहे. दानवेंनी माफी मागावी अशी मागणी होत होती मात्र दानवेंनी माफी मागितली नाही.मला असं वाटतं शेतकऱ्याची विटंबना मीच काय कोणीच करू शकत नाही. पण एखाद्या बोलण्याचा विपर्यास बातमीमुळे होत असेल तर माझा नाईलाज आहे. शेतीच्या क्षेत्रात ज्या माणासाने जन्म घेतला तो शेतकरी विरोधी वक्तव्य करू शकत नाही, असं दानवे म्हणाले.

काय म्हणाले होते रावसाहेब दानवे?

“हे आंदोलन चालू आहे. हे शेतकऱ्यांचं आंदोलन नाही. याच्या पाठीमागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. या देशामध्ये पहिल्यांदा मुस्लीम समाजाला उचकवलं आणि सांगितलं सीएए आणि एनआरसीमुळे मुस्लिमांना देशातून बाहेर जावं लागेल”. एखादा तरी मुसलमान बाहेर गेला का?,” असं रावसाहेब दानवेंनी म्हटलं आहे.“त्यांना वाटलं हे यशस्वी होणार नाही. यामुळे आता शेतकऱ्यांना सरकार तुम्हाला तोट्यात घालत असल्याचं सांगत आहेत. हे बाहेरच्या देशाचं षडयंत्र आहे. आपल्या देशातील शेतकऱ्यांनी याचा विचार केला पाहिजे,” असंही ते म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांनी फणा काढून बोलण्याची गरज नाही !

News Desk

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी अखेर श्रीनिवास रेड्डीला अटक

News Desk

पुणे मेट्रोवरुन भाजप-राष्ट्रवादीत श्रेयवादाची लढाई !

News Desk