HW News Marathi
देश / विदेश

“आपल्याला मंत्रीपदासाठी ४२ वर्ष लागली, तुम्ही नशीबवान आहात,” दानवेंचा कराड आणि पाटलांना टोला?

नवी दिल्ली | मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्म मधल्या केंद्रिय मंत्रीमंडळ विस्तारात नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली. दरम्यान, या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातून संधी मिळालेल्या राज्यातील चार नव्या मंत्र्यांचा दिल्लीत सत्कार करण्यात आला. नारायण राणे, कपिल पाटील, भागवत कराड आणि भारती पवार यांचा सत्कार करण्यासाठी दिल्लीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि रावसाहेब दानवे यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना रावसाहेब दानवे यांनी आपल्याला मंत्रीपदासाठी ४२ वर्ष लागली, पण तुम्ही नशीबवान आहात असं म्हणत भागवत कराड आणि कपिल पाटील यांना मिश्कील टोला लगावला आहे.

“आपण केंद्रात मंत्री झालात. आता हा अनुभव वेगळाच आहे. आपल्याला मंत्रीपदासाठी ४२ वर्ष लागली. मला ४२ वर्ष लागली पण तुम्ही सहा महिन्यात काम केलं. नक्कीच तुम्ही माझ्यापेक्षा जास्त काम मंत्रिमंडळात कराल,” असं रावसाहेब दानवे भागवत कराडांचा उल्लेख करत म्हणाले. “कपिल पाटीलदेखील मी नवीन आहे म्हणाले. तुम्ही सात वर्षात राज्यमंत्री झालात हे पण काही कमी नाही. मला ४२ वर्ष लागली. तुमच्यासारखे नशीबवान लोक सापडणं कठीण आहे,” असा मिश्कील टोला रावसाहेब दानवेंनी लगावला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मोदी सरकारविरोधात चार पक्षांचा अविश्वास प्रस्ताव

News Desk

पाकिस्तानकडून बेछूट गोळीबार, जवान शहीद

Gauri Tilekar

लाडक्या अभिनेत्यासाठी बनविली चक्क ५७ किलोची इडली!

News Desk