HW News Marathi
महाराष्ट्र

आम्ही सरकार पाडणार नाही तर ,’अमर, अकबर आणि अँथनी’चे सरकार पायात अडकूनच पडेल

पुणे | विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षामध्ये केंद्राने लागू केलेल्या कृषी कायद्यावरुन आग पाखड सुरुच आहे. यावर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आघाडी सरकारवर टीका केली आहे. पुण्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गेल्या ६ वर्षांत काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांना कुठलाच विषय मिळाला नाही म्हणून ते कृषी विधेयकाला विरोध करत आहेत, असा आरोप केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे.
रावसाबेब दानवे यांनी महाराष्ट्रातील आघाडी सरकारवर देखील निशाणा साधत महाराष्ट्रात ‘अमर, अकबर आणि अँथनी’चे सरकार आहे. ते पायात पाय अडकून पडेल. मात्र, आम्ही सरकार पाडणार नाही, अशा शब्दांत दानवे यांनी टिका केली आहे. विरोधक चुकीचे आरोप करीत आहेत. ते खोडून काढण्याचे आमचे काम आहे. आम्ही विरोधकांना घाबरत नाही. आमच्याबाबत गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न होत आहे. गेली सहा वर्ष विरोधकांकडे मुद्देच नाहीत. त्यातून ते कृषी विधेयकावरून मोदी सरकारवर आरोप करीत आणि रस्त्यावर उतरत आहेत. केंद्र सरकार बाजार समित्या बंद करणार नाही.
मात्र बाजार समितीतील गोंधळ कमी करणार आहे. विधेयकामुळे व्यापारी हे थेट शेतकऱ्यांकडून माल खरेदी करतील. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे एकीकडे ‘काटा’ दुसरीकडे नोटा असतील, असा दावा दानवे यांनी केला आहे.शेतकऱ्यांचा शेतमाल किमान आधारभूत किंमतीने विकला जाणार आहे. बाजार समित्या संपुष्टात येणार नाहीत. या विधेयकांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. स्पर्धा वाढल्यामुळे त्याचा फायदा होणार असल्याचे दानवे यांनी म्हटले आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मराठा आरक्षणावर फडणवीसांनी राजकारण न करता आमच्यासोबत यावं, राऊतांचे आवाहन!

News Desk

महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था नीट चालू नये अशी दिल्लीतील काही लोकांची इच्छा दिसते 

News Desk

चित्रपट, नाटक, संगीत समीक्षकांचाही सन्मान विचाराधीन! – अमित देशमुख

Aprna