HW News Marathi
महाराष्ट्र

बाप्पा पावला! गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्यांना खुशखबर; रावसाहेब दानवेंनी मोठी घोषणा

नवी दिल्ली | ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या महिन्यात लोकांना ओढ लागते आपल्या लाडक्या बाप्पाची. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सण समारंभ सध्या पद्धतीने करायचे ठरवले आहेत. गणपतीत कोकणात जाणाऱ्यांची संख्याही जास्त असते. गेल्या वर्षी कोरोनाच्या जास्त रुग्ण संख्येमुळे कोकणात जास्त कोणाला प्रवेश न्हवता. या वर्षी मात्र बापा पावला म्हणावं लागेल. गणेशोत्सावासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये म्हणून केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे.

कोकणात जाण्यासाठी ७२ स्पेशल गाड्या

कोकणात चाकरमान्यांना जात यावं म्हणून केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी एक मोठं निर्णय घेतला आहे. गणेशोत्सावात कोकणात जाण्यासाठी ७२ स्पेशल गाड्या सोडण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. तशी घोषणाच नवे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे. गणेश उत्सवासाठी मुंबईतून आपआपल्या गावी जाणाऱ्या कोकणवासियांची प्रवासादरम्यान कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वे मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सव काळात CSMT- सावंतवाडी रोड डेली स्पेशल या गाडीच्या एकूण ३६ ट्रिप होतील. तसेच CSMT- रत्नागिरी बाय विकली स्पेशल या गाडीच्या १० ट्रिप होणार आहेत. पनवेल- सावंतवाडी रोड ट्राय विकली स्पेशल या गाडीच्या १६ ट्रीप होतील आणि पनवेल रत्नागिरी बाय विकली स्पेशल या गाडीच्या एकूण १० ट्रीप होणार आहेत, असे रावसाहेब दानवे यांनी सांगितलं आहे.

अधिक गाड्या सोडण्याचे निर्देश

कोरोना विषाणूची गांभीर्यता लक्षात ठेऊन सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. आपण प्रत्येकाने कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर प्रवासा दरम्यान कोरोना प्रतिबंधक नियम पाळलेच पाहीजे. 72 गाड्या सोडूनही जर वेटींग असेल. प्रवासाची अडचण होत असेल तर रेल्वे मंत्रालयाने अधिक गाड्या सोडण्याचे असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला दिले आहेत. मात्र कोकणवासीयाची प्रवासा दरम्यान कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची पूर्ण काळजी घेत आहोत, असंही त्यांनी सांगितलं आहे.

कश्या सोडल्या जातील गाड्या

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना सोडण्यात आलेल्या ७२ विशेष रेल्वे गाड्या फुल झाल्या असून रेल्वेने अजून अधिकच्या गाड्या सोडाव्यात, अशी मागणी शेलार यांनी केली आहे. दरवर्षीच्या तुलनेत या गाड्या कमी असून २०१९ ला कोकण रेल्वेवर २१० फेऱ्या व रेल्वे गाड्यांना ६४७ अतिरिक्त डबेही जोडले होते. तर त्यावेळी तिकीटांसाठी ज्यादा बुकिंग साठी ११ टपाल खात्यात, १७ रेल्वे स्थानकात पीआरएस सिस्टम आणि १६ ठिकाणी टाऊन बुकिंग एजन्सी आदी सुविधा २०१९ ला खास कोकणवासीयांना उपलब्ध करुन दिल्या होत्या. त्यामुळे याही वर्षी अशा अधिकच्या बुकिंग सुविधा व अजूनच्या काही गाड्या कोकणातील चाकरमान्यांना उपलब्ध करुन देण्याबाबत कोकण रेल्वेला निर्देश द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पांगरीच्या सरपंचाचा अनोखा उपक्रम

News Desk

टिपू सुलतान यांच्याविषयी चुकीचे बोललो असेन तर राष्ट्रपतींना जाऊन विचारा! – नवाब मलिक

Aprna

राज्यातील विशेषत: असंघटीत क्षेत्रातील कारागीर, कुशल कामगारांना होणार लाभ ! | नवाब मलिक

News Desk