HW News Marathi
महाराष्ट्र

रश्मी शुक्ला यांनी भाजपमध्ये जाण्यासाठी दबाव आणला होता, ठाकरे सरकारमधील ‘या’ नेत्याची कबूली

कोल्हापूर | आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी पोलीस विभागात बदलीसाठी मोठा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर राज्याच्या राजकारणाचा पारा चांगलाच चढला आहे. त्यामुळे राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी तातडीने या विषयावरचा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर केला आहे. यामध्ये त्यांनी रश्मी शुक्ला यांचे दावे, बदलीच्या प्रक्रिया आणि फोन टॅपिंग याबाबत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. तसेच, रश्मी शुक्ला यांनी दबाव टाकल्याचा आरोप सरकारकडून केला जात होता.

राज्यात सरकार स्थापन करतेवेळी मी भाजपसोबत जावे यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी माझ्यावर दबाव टाकला होता, अशी कबुली आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली आहे.मी ही गोष्ट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या कानावर घातली होती. त्या काळामध्ये मी भाजपसोबत यावे, यासाठी शुक्ला मला भेटल्या होत्या. मात्र, मला शिरोळ तालुक्यातील जनतेने निवडून दिले आहे. त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय मी निर्णय घेणार नाही, असे मी शुक्ला यांना सांगितले. त्यानुसार मेळावा घेऊन, जनतेची मते आजमावून मी शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला, असे राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सांगितले.

यड्रावकर म्हणाले की, “त्या काळामध्ये मी भाजपसोबत जावे यासाठी शुक्ला मला भेटल्या होेत्या. मात्र, मला शिरोळ तालुक्यातील जनतेने निवडून दिले आहे, त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय निर्णय घेणार नसल्याचे शुक्ला यांना सांगितले होते. त्यानुसार मेळावे घेऊन, जनतेची मते आजमावून शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला”, असेही यड्रावकर यांनी स्पष्ट केले आहे. गृहनिर्माण मंत्री व राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही पत्रकार परिषदेत आरोप केला होता.

रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंगची अतिशय वाईट सवय ! – जितेंद्र आव्हाड

फोन टॅपिंग प्रकरणी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “फोन टॅपिंग करणं हा मोठा गुन्हा आहे. तसेच कोणाचाही फोन टॅप करायचा असेल तर त्याला गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांची परवानगी आवश्यक असते. रश्मी शुक्ला यांनी अशा प्रकारची परवानगी गेतली होती का? सिताराम कुंटे यांनी या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ असे दिले आहे. रश्मी शुक्ला यांनी परवानगी एकाच्या नावाने घेतली आणि फोन टॅपिंग दुसऱ्या लोकांचे केलेत. रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंगची अतिशय वाईट सवय होती. हे आधीच्या सरकारापासून सुरु होते. त्यांचे याबाबतच एक पत्रही उघडकीला आले. त्यानंतर त्यांनी आपली चूकही कबूल केली होती”, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

रश्मी शुक्ला यांनी पोलीस विभाग आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम केले

रश्मी शुक्ला यांच्यावर फोन टॅपिंगसंबंधित आरोप करताना जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की, “रश्मी शुक्ला यांनी फोन टॅप करुन नंतर त्याचा वापर करायचा असे प्रकार यापूर्वीही केलेले आहेत. रश्मी शुक्ला यांनी आपल्या वरिष्ठ नोकरशाहांचा विश्वासघात करुन ही गद्दारी केली आहे. इतकेच नव्हे तर पोलीस विभाग आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम केले. त्यानंतर त्याला बदल्यांमधील भ्रष्टाचाराची जोडही दिली. ज्यांच्या बदल्या झाल्या आहेत ती नावे इतकी चिल्लर आहेत की त्यांचे फोनही कुणी घेणार नाहीत. हे एक षडयंत्र रचले गेले आहे”, असेही जितेंद्र आव्हाड त्यांनी यावेळी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीत सन्मानाने प्रवेश दिल्याने, भाजप केंद्रीय एजन्सीचा गैरवापर करतेय’

News Desk

रामदास आठवलेंची भूमिका मराठी भाषेविरूद्ध?

News Desk

‘वेळ आली तर शिवसेना भवन फोडू’, या विधानाला संजय राऊतांचं प्रत्युत्तर!

News Desk