HW News Marathi
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात न जाण्यासाठी रवी राणा आंदोलन करणार

अमरावती | मुख्यमंत्री ऐकत नाहीत, शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ नये म्हणून आंदोलन करणार असल्याचा इशारा आमदार रवी राणा यांनी दिला आहे. अमरावतीतील बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

दिवाळी दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे, मात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नाही. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अनेकदा निवेदने दिली, फोन केले. पण त्यांनी दखल घेतली नाही, शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाता कामा नये, त्यामुळे आता शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये नुकसानभरपाई तातडीनं देण्यात यावी, यासाठी मी आता रस्त्यावर उतरून आंदोलन करणार, असा इशारा अमरावतीतील बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी दिला आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून इशारा दिला होता. राज्यभरात झालेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी हवालदिल व त्रस्त झाला आहे, तर शासनाने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले असल्याचा आरोप अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

युध्दपातळीवर वीजपुरवठा सुरू करण्यासाठी ऊर्जा विभागाला आदेश

News Desk

सातवा वेतन आयोग व इतर मागण्यांसाठी 7 ते 9 ऑगस्टला राज्यव्यापी संप

News Desk

…म्हणून फडणवीसांनी जोडले मुख्यमंत्र्यांसमोर हात

News Desk