HW News Marathi
महाराष्ट्र

कार्तिकी एकादशीला आळंदीमधील मंदिर भक्तांसाठी खुलं 

आळंदी | कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यंदाची कार्तिकी एकादशीची यात्रा प्रतिकात्मक आणि मर्यादित स्वरुपात करण्याचा निर्णय राज्य सरकार आणि सोलापूर जिल्हा प्रशासनानं घेतला आहे. यामुळे २५ ते २७ नोव्हेंबर दरम्यान विठ्ठल-रुक्मिणी मातेचं सध्या सुरू करण्यात आलेलं मुखदर्शनही बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीच्या वतीनं घेण्यात आला आहे. पण २६ नोव्हेंबरच्या कार्तिकी एकादशीला आळंदीमधील मंदिर भक्तांसाठी खुलं असणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानच्या विश्वस्तांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

पंढरपूर आणि देहूतील मंदिरं यादिवशी बंद असणार आहे. यामुळे भाविकांनी आळंदीत गर्दी केल्यास त्यावेळची परिस्थिती पाहून मंदिर बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल असंही बैठकीत ठरवण्यात आलं आहे. दरम्यान, १३ डिसेंबरचा संजीवन समाधी सोहळा कसा पार पडेल याचा निर्णय पुढील बैठकीत घेतला जाणार असल्याची माहिती संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानच्या विश्वस्तांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आम्ही शरजील सोबत आहोत”, एल्गार परिषद शरजीलच्या पाठीशी ठामपणे उभी

News Desk

सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आता ‘सावित्री उत्सव’ म्हणून ओळखला जाणार

News Desk

“प्रिय देवेंद्रजी तुम्ही हे कसं विसरू शकता की…”, राऊतांनी फडणवीसांना करून दिली ‘ती’ आठवण!

News Desk