HW News Marathi
महाराष्ट्र

बिहारमध्ये दुसऱ्याची बायको पळवली, महाराष्ट्रातही गुपचूप लग्न केलं होतं पण…!

मुंबई । राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना सुनावले आहे. “रावसाहेब दानवे येऊन जाऊन बाप काढतात. त्यांना कोणाचाही बाप काढायचा अधिकार नाही. दानवेंना विचारा त्यांचे बाप कोण आहे ?कोणाचे बाप, किती बाप?”, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला. दानवेंनी एका कार्यक्रमात राज्य सरकारवर केंद्राकडे आर्थिक मदत मागण्याविषयी टोकाची टीका केली होती. त्यालाच विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

महाराष्ट्रातही सकाळी सकाळी गुपचूप लग्न केलं होतं पण…!

विजय वडेट्टीवार पुढे असेही म्हणाले की, “केंद्र सरकार राज्याला मदत करते म्हणजे कोणते उपकार करत नाही. NDRF च्या निकषावर मदत मिळणं हा आमचा हक्क आहे. हे निकष दानवे यांना माहीत नाहीत काय ?” तर भाजपवर निशाणा साधताना वडेट्टीवार म्हणाले की, “बिहारमध्ये गेल्या वेळी दुसऱ्याची बायको पळवली होती. महाराष्ट्रातही सकाळी सकाळी गुपचूप लग्न केलं होतं. मात्र, संसार टिकला नाही. अक्षदा पडण्यापूर्वीच नवरी पळाली.”

काय म्हणाले होते दानवे ?

एका सभेत रावसाहेब दानवे राज्य सरकारला उद्देशून म्हणाले होते की, “चोरून लग्न केलं, संसार थाटला मग बापाला पैसे का मागता ?” तर गुरुवारी औरंगाबादमध्ये झालेल्या सभेतही “हे मोदींकडे पैसे मागतात मी इतकंच म्हणालो की, चोरून संसार तुम्ही करता, पैसे बापाकडे मागता. आता आमच्याकडे कशाला पैसे मागता ?तुमचं सरकार म्हणजे तुमची जबाबदारी आहे” असे विधान दानवेंनी पुन्हा केले. याच पार्श्वभूमीवर, वडेट्टीवार यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.


Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पालघर, ठाण्यासह मुंबईतील सर्व शाळा-कॉलेजना उद्या सुट्टी जाहीर

News Desk

अखेर सवर्ण आरक्षण महाराष्ट्रात लागू

News Desk

शरद पवारांचा ‘हा’विश्वासू नेता लवकरचं शिवसेनेत..

Gauri Tilekar