HW News Marathi
महाराष्ट्र

“काँग्रेसची माडी कधीही कोसळू शकते”, रावसाहेब दानवेंचा हल्ला

नवी दिल्ली | महाविकास आघाडी सरकारमध्ये सध्या कुरबुर सुरु आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसवर टीका केली होती, त्यालाच प्रत्युत्तर देत काँग्रेस नेते बाळासाहेवबा थोरात यांनी देखील शरद पवारांना टोला लगावला आहे. या सगळ्या घटनांमुळे राजकीय वर्तुळात नवीन चर्चांना उधाण आलं आहे. बाळासाहेब थोरात यांच्या वक्तव्यावर आता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी खिल्ली उडवली आहे. काँग्रेसची माडी कधीही कोसळू शकते. म्हणूनच पवारांनी त्या माडीला टेकू दिला आहे, अशा शब्दात रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसची खिल्ली उडवली आहे.

पवारांनी राष्ट्रवादीच्या स्वरुपात नवी माडी बांधली

रावसाहेब दानवे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसची टीकेतून खिल्ली उडवली आहे. शरद पवार अनेक वर्ष काँग्रेसच्या हवेलीत राहिले आहेत. पण ही माडी मोडकळीस आल्याचं कळताच त्यांनी माडी सोडली. पवारांनी राष्ट्रवादीच्या स्वरुपात नवी माडी बांधली. आता पवारांनी काँग्रेसच्या माडीला टेकू दिलेला आहे. तुमची माडी कधीही पडू शकते हे त्यांनी दाखवून दिलं आहे, असं सांगतानाच बाळासाहेब थोरातांची ऑफर हस्यास्पद आहे. पवारांनी टेकू काढून घेतला तर काँग्रेसची माडी कधीही कोसळू शकते, अशी खोचक टीका दानवे यांनी केली आहे.

ईडी आणि सीबीआय ही काँग्रेसची देण

यावेळी त्यांनी ईडीच्या कारवाईवरूनही भाष्य केलं. ईडी आणि सीबीआय ही काँग्रेसची देण आहे. काँग्रेसच्या काळातच अशोक चव्हाण यांची सीबीआय चौकशी झाली होती. लालू प्रसाद यादव यांची चौकशी झाली होती. आपल्याच लोकांना काँग्रेसने टार्गेट केलं होतं, असं सांगतानाच यंत्रणांना तक्रारी मिळतात. त्यानुसार ते कारवाई करतात. सर्व यंत्रणा या स्वतंत्र यंत्रणा आहेत, असं त्यांनी सांगितलं आहे.

ओबीसींसाठी आरक्षित उमेदवारी

केंद्र सरकारने राज्यांना ओबीसी आरक्षणाबाबतचा अधिकार दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारने आता त्याबाबतची पावलं उचलण्याची गरज आहे, असं सांगतानाच भाजप आधी ओबीसींसाठी आरक्षित असलेल्या जागेवर ओबीसींना उमेदवारी देईल. अनेक ठिकाणी तर आधीच फॉर्म भरण्यात आले आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

जिल्हा परिषदांमध्ये ओबीसी विरुद्ध ओबीसी

विजय वडेट्टीवार यांनी निवडणुकांबद्दल माध्यमांशी संवाद साधला आहे. ओबीसींच्या हक्काचं आरक्षण वगळून कुणालाही पुढे जायचं नाही. राज्यातील ओबीसी जागृत आहे. ओबीसींच्या जागेवर इतरांना उभं करणं सर्वच पक्षाला महागात पडणार आहे. त्यामुळे उद्या ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका लढवण्याची वेळ आली तर सर्वच पक्ष ओबीसींच्या आधीच्या आरक्षित जागेवर उमेदवार देणार आहेत. तसं सर्वच पक्षाने जाहीरही केलं आहे. आमच्या पक्षाचीही तीच भूमिका आहे. पुढील जिल्हा परिषदांमध्ये ओबीसी विरुद्ध ओबीसी अशीच निवडणूक होईल. ओबीसी विरुद्ध खुला वर्ग अशी निवडणूक होणार नाही. सगळ्यांना त्या प्रक्रियेतून जावं लागेल, ते करावंच लागेल. त्यातच त्यांचं भलं आहे. कारण राज्यातील ओबीसी जागृत आहे, असं वडेट्टीवार म्हणाले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोल्हापूरमधील काँग्रेसचे दिग्गज नेते भाजपच्या वाटेवर ?

News Desk

“कोणी तरी मरावे हे माझ्या संस्कृतीत बसत नाही,” सुप्रिया सुळेंनी केतकीला खडेबोल सुनावले

Aprna

विधानसभा निवडणुकीत सरकार स्थापन करणारे तुमचे बाप कोण आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे 

News Desk