HW News Marathi
महाराष्ट्र

तब्लिगीच्या उरलेल्या ५० जणांनी स्वत:हून पुढे या, अन्यथा कारवाई करु

मुंबई | राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ८९१ वर पोहोचली आहे. दिल्लीतील निजामुद्दीनमधील मरकजमध्ये सहभागी झालेल्या तब्लिगींमुळे राज्यातील प्रशासनाची झोपचं उडाली. मात्र, या समाजातील लोकं आपापल्या राज्यात गेल्यानंतरही साडे तेराशे जणांपर्यंत प्रशासन पोहोचले आहे. परंतू, त्यातील ५० जणांचा अजूनही शोध लागला नसून त्यांनी स्वत: पुढे यावे अशी प्रशासनाने मागणी केली आहे. जर स्वत: पुढे येऊन चाचणी नाही केली तर आम्ही योग्य ती कारवाई करु असा इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.

दरम्यान, वसईत १५-१६ मार्चला तब्लिगी जमातीचा हा कार्यक्रम होणार होता. मात्र, कोरोनाची स्थिती लक्षात घेत राज्य सरकारने या कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती. या कार्यक्रमासाठी ५० हजारा जण उपस्थित राहणार होते. वेळीच सावध होत ही परवानगी नाकारल्याने मोठा अनर्थ टळला असे गृहमंत्र्यांनी सांगितले.

तसेच, लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्य बाबी खरेदी करण्यासाठी जायचे खोटे कारण देऊन जर बाहेर फिरत राहाल तर त्यांची वाहने जप्त होतील असा कडक इशाराही गृहमंत्र्यांनी विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांना दिला आहे. पोलीस, डॉक्टर, नर्सेस थोडक्यात सर्वच वैद्यकीय कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवा जीव धोक्यात घालून काम करत आहेत. त्यामूळे त्यांच्यावर हात उचलणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जिल्हाधिकारी डोंगरे यांनी नायगाव व बिलोली तालुक्यातील जलयुक्त शिवार अभियांतर्गत विविध कामांची पहाणी केली

News Desk

पुण्यात कर्जबाजारी दाम्पत्याची आत्महत्या

swarit

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात

News Desk