HW News Marathi
महाराष्ट्र

रेल्वे सेवा सुरु करा, अन्यथा सविनय कायदेभंग करावा लागेल- मनसेचा इशारा

मुंबई | बेस्ट बसमध्ये होणाऱ्या गर्दीचा व्हिडीओ ट्वीट करत मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ठाकरे सरकारला प्रश्न विचारला आहे. तसेच,लोकल लवकरात लवकर सुरु न केल्यास सविनय कायदेभंग करण्याचा इशारा मनसेने दिला आहे. “बसच्या गर्दीत कोरोना होत नाही, पण रेल्वेच्या गर्दीत होतो, असा सरकारचा समज आहे का??” असा प्रश्न संदीप देशपांडे यांनी विचारला आहे. खचाखच गर्दीने भरलेल्या बसचा व्हिडीओ शेअर करत त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे.

लोकल लवकर सुरु करा अशी मागणी सर्व स्तरांतून केली जात आहे. विशेषतः उपनगरात राहून रोज कार्यालयासाठी मुंबईपर्यंत प्रवास करावा लागणाऱ्या नागरिकांकडून होत आहे. हीच मागणी उचलून धरत “रेल्वे सेवा सुरु करा, अन्यथा सविनय कायदेभंग करावा लागेल” असा इशारा संदीप देशपांडे यांनी बसमधील गर्दीचा एक व्हिडीओ शेअर करत दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘जर महाराष्ट्र सरकारचे पाय खेचायचा प्रयत्न केला तर तुमचा पाय अडकेल’ -संजय राऊत

News Desk

पुन्हा एकदा भाजपचेच सरकार येणार, फडणवीसांचा विश्वास

News Desk

सामनाच्या प्रकाशनावर तीन दिवस बंदी घाला : श्वेता शालिनीe

News Desk