HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपळूणकडे रवाना, नुकसानीची करणार पाहणी

रत्नागिरी। चिपळूणमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाल्याने अनेक घरं उध्वस्त होऊन लोकांचं नुकसान झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (२४ जुलै) महाडच्या तळीये गावाच्या परिस्थितीचा आढावा घेतला असून आज (२५ जुलै) ते चिपळूणला जाणार आहेत. उद्धव ठाकरे हे चिपळूणला जाणार असल्याची माहिती त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून सांगितलं आहे. गुहागरमधून ते चिपळूणकडे रवाना झाले आहेत. नुकसान झालेल्या भागाची ते पाहणी करणार आहेत.

चिपळूणसाठी रवाना

‘मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आज चिपळूण येथे पूरपरिस्थितीची पाहणी करणार.’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ही माहिती त्यांच्या ट्विटर अकाउंटला दिली आहे. महाडच्या तळीये गावातजी दुर्घटना घडली त्याची पाहणी केल्यावर आता उद्धव ठाकरे हे चिपळूणच्या दिशेने रवाना झाले आहेत. पूरग्रस्तांना मदत सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहीर केली आहे.

नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस चिपळूणला रवाना

कोकणात पूरपरिस्थिती निर्माण होऊन अनेक लोकांना आपले प्राण गमावले आहेत . दर्दी कोसळून कित्येकांची घरं उध्वस्त आहेत. कोकणातले नेते जे आता केंद्रीय मंत्री आहेत ते नारायण राणे आता पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी निघाले आहेत, अशी माहिती त्यांनी आपली ट्विटर अकाउंट वरून दिली आहे. संसदेत केंद्रीय मंत्रिमंडळाचं आदिवेशन सुरु आहे. नारायण राणे हे दिल्लीहून कोकणात रवाना झाल्याची माहिती त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंट द्वारे सांगितलं आहे. ‘माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संमतीने मी, देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांच्‍यासह रायगड जिल्ह्यातील तळये, रत्नागिरीतील चिपळूण येथील दुर्घटनाग्रस्त परिसराची पाहणी करण्यासाठी रवाना होत आहोत’, असं ट्विट त्यांनी केलं आहे.

पूरग्रस्तांना मदत

पुरात अडकलेल्या लोकांना अण्णा, पाणी काहीच उपलब्ध नसल्याने अनेक संस्था आता पुढे येऊन मदत करत आहेत. माणगाव येथे सुमारे २००० फुड पॉकेट्स तयार आहेत. अजून २००० अन्नाची पाकिटे तयार होतील. याबाबत तहसीलदार माणगाव ही पाकिटे गरजू लोकांना वितरणाचे नियोजन करीत आहेत. माणगाव तहसील कार्यालयातून महाडकडे एसटी बसने खाण्यापिण्याचे साहित्य रवाना झाले आहे. स्वयंसेवी संस्थांनी देखील यासंदर्भात महाड येथे प्रशासनाच्या संपर्कात राहावे व कपडे, अन्न याची मदत पोहचवावी, असे आवाहन केल्याचेही जिल्हाधिकारी चौधरी यांनी सांगितलं आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नारायण राणे यांना शिवसेना का घाबरते?

News Desk

लोकांना दाखवलेली स्वप्न पूर्ण करण्यात सरकार अपयशी !

News Desk

नामांकित इंग्रजी वृत्तपत्राला मलिकांची नोटीस; जाणून घ्या… काय आहे प्रकरण

Aprna