HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपने ‘ते’ पुस्तक तर मागे घ्यावेच, पण संपूर्ण देशातील जनतेची माफी मागावी !

मुंबई | “भाजपने ते पुस्तक तर मागे घ्यावेच, पण संपूर्ण देशातील जनतेची माफी मागावी,” अशी मागणी असल्याचे महसूल मंत्री बळासाहेब थोरात यांनी केली आहे. थोरात पुढे म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करणे चुकीचे आहे.” अशी प्रतिक्रिया थोरातांनी दिली आहे. ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून देशभरातील शीवप्रेमींमध्ये संताप पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांनी आज (१३ जानेवारी) आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी थोरात म्हणाले की, “भाजपने ते पुस्तक तर मागे घ्यावेच, पण संपूर्ण देशातील जनतेची माफी मागावी, अशी आमची मागणी आहे”

थोरात पुढे म्हणाले की, या पुस्तकाचे प्रकाशन भाजपच्या कार्यलयात कसे होते, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस उद्या (१४ जानेवारी) राज्यभरात आंदोलन करत आहे. तसेच छपाक आणि तानाजी हे दोन्ही चित्रपट करमुक्त असावे, अशी मागणी थोरांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. त्याचबरोबर थोरात म्हणाले की, यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी देखील बोलणार असल्याची त्यांनी सांगितले.

भाजप नेते जय भगवान गोयल यांनी लिहिलेल्या ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून भाजपवर टीका होता आहे. या पुस्तकारचे प्रकाशन काल (१२ जानेवारी) करण्यात आले. या पुस्तकारवरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. “सातारा गादीचे वारसदार श्रीमंत उदयन राजे, श्रीमंत शिवेंद्रराजे आणि कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे या सर्वांचा आदर आहे. त्या गाद्यांचा आम्ही सन्मान करतो. त्या सर्वांना आम्ही जर यावर भूमिका घ्या, असे बोललो तर त्यात चुकीचे काय?,” असा सवाल राऊतांनी आज (१३ जानेवारी) पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक जयस्तंभास व शहीद वीरांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून विनम्र अभिवादन

Aprna

“ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका” रामदास आठवलेंचं भाष्य!

News Desk

#CoronaVirus : राज्यातील ‘ही’ चार शहरे येत्या ३१ मार्चपर्यंत बंद राहणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

swarit