HW News Marathi
महाराष्ट्र

नगरमध्ये संतप्त ग्रामस्थांचे रास्तारोको

अहमदनगर : शाळेची इमारत कोसळून सोमवारी सायंकाळी तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या निंबोडीच्या गावक-यांनी मंगळवारी अहमदनगर – सोलापूर राज्यमार्गावर तब्बल दोन तास रास्तारोको केले. या वेळी आ. शिवाजी कर्डीले, आ. राहुल जगताप, शिवसेनेचे दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे, आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, गावातील शाळेला कुलूप ठोकण्यात आले असून शाळेसाठी नवीन इमारत उभी करेपर्यंत मुले शाळेत न पाठविण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.

अहमदनगर- निंबोडी राज्यमार्गावर सकाळी साडेनऊच्या सुमारास रास्तोरोकोला सुरुवात झाली. मागण्या मान्य होत नाहीत,तोवर माघार घेणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली. गावात दुसरी शाळा उभारण्याची मागणीही करण्यात आली. तसेच मयतांच्या कुटुबियांना जास्तीत जास्त शासकीय मदत मिळावी. जखमींचा सर्व खर्च शासनाने करावा, यासह विविध मागण्या या वेळी ग्रामस्थांनी केल्या.

आ. शिवाजी कर्डीले यांनी ग्रामस्थांना रास्तारोको मागे घेण्याचे आवाहन करत दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. फोनवरून शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी संपर्क साधला. यावेळी तावडे यांनी गावक-यांच्या सर्व मागण्या मान्य करत असून येत्या आठ दिवसांत नवीन शाळेसाठी सर्व मदत करू, असे आश्वासन दिले. त्यानंतर साडेअकरा वाजण्याच्या सुमारास रास्ता रोको मागे घेण्यात आला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आरोपीच्या सांगण्यावरून कारवाई कशी होऊ शकते? हसन मुश्रीफ यांचा ईडीला सवाल

News Desk

कंगणाने मुंबईला शहाणपण शिकवण्याची गरज नाही, भाजपने घेतला युटर्न! 

News Desk

राज्यातील ५ मृत्यू डेल्टा प्लसमुळे झाले नाहीत, आरोग्यमंत्र्यांची महत्त्वाची माहिती!

News Desk
मुंबई

निकाल लागला पण विद्यार्थ्यांनी नाही पाहिला

News Desk

मुंबई : धडपडत, चाचपडत रविवारी रात्री उशिरा मुंबई विद्यापीठाने एकदाचा टीवाय बीकॉमचा निकाल जाहीरकेला खरा, पण अद्यापही तो विद्यार्थ्यांना काही पाहाता आलेला नाही. संकेतस्थळाच्या तांत्रिक अडचणींचे कारण यासाठी देण्यात येत असले, तरीही त्याने त्रस्त विद्यार्थ्यांचे काही समाधान झालेले नाही. त्यामुळे सोमवारी अनेकविद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे धाव घेतली होती. मुंबई विद्यापीठाने मार्च-एप्रिलदरम्यान, पदवी अभ्यासक्रमाच्या घेतलेल्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी ऑनलाइन सुरू आहे. ऑगस्ट महिना उजाडूनही ४० हून अधिक अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झालेलेनाहीत. काही निकाल तांत्रिक अडचणींमुळे राखीव ठेवले आहेत. मात्र येत्या १० दिवसांत विद्यार्थ्यांना निकाल देण्यात येतील, असे विद्यापीठाकडून सांगण्यात येत आहे.

Related posts

शिवस्मारकाची रचना बदलणार ?

News Desk

शिवसैनिकांसाठी वाघाची अंगठी

swarit

मुंबईतील हवा प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजनांना गती द्यावी; अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार

Aprna